शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब रेल्वे मार्गाचे बुधवारी उद्घाटन

By नरेश डोंगरे | Updated: February 24, 2024 05:34 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा : रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी

नरेश डोंगरे

नागपूर : तीस दिवसांत दोनदा उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाची गाडी बुधवारी २८ फेब्रुवारीला वर्धा ते कळंब या रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर प्रशासनाने उद्घाटन कार्यक्रमाची जोरदार तयारी चालविली आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन मागास भागांच्या विकासाची गाडी समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प २८४.६५ किलोमीटर लांबीचा आहे. ११ फेब्रुवारी २००९ ला या प्रकल्पाचे तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते, तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत भूमीपूजन झाले होते. त्यावेळी त्यासाठी २७४.५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. आता मात्र पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करताना या प्रकल्पाचा खर्च सुमारे 5 ते 6हजार कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, आतापावेतो १९१० कोटी, ७ लाख रुपये खर्च करून सरकारने वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण केले आहे. सुरक्षेच्या मानकांची तपासणी करण्यासाठी वर्धा- देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही घेतली. त्यानंतर वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेगाडी चालविण्याचा प्रस्ताव वजा निर्णय रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम प्रारंभी १२ जानेवारी २०२४ ला ठरविण्यात आला. मात्र, नंतर तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरले. मात्र, पंतप्रधानांचा यवतमाळ जिल्ह्याचा दाैरा पुढे ढकलण्यात आल्याने त्याहीवेळेला या मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. आता मात्र २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधानांचा दाैरा, कार्यक्रम जवळपास निश्चिंत झाला आहे. रेल्वे मंत्रालयातूनही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना तशी सूचना मिळाली आहे. त्यामुळे वर्धा-कळंब रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामी लागले आहे.

उद्घाटनासाठी आम्ही सज्ज : अमन मित्तल

या संबंधाने अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी २८ फेब्रुवारीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची अधिकृत सूचना अद्याप आली नाही. तथापि, पंतप्रधानांच्या दाैऱ्याची माहिती आली असून आम्ही वर्धा-कळंब मार्गाच्या उद्घाटनासाठी सज्ज असल्याचे म्हटले.पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, ही अत्यंत सुखद घडामोड : डॉ. विजय दर्डा

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रकल्पाच्या मंजुरीपासून तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्यापर्यंत डॉ. दर्डा यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचमुळे या प्रकल्पाला वेग मिळाला आणि आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे डॉ. दर्डा यांना या संबंधाने प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वत: या लोहमार्गाचे उद्घाटन करणार, ही खूपच सुखद घडामोड आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण तसेच व्यापारी अशा सर्वांसाठीच भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे आपल्याला आनंदच आहे. मात्र, या प्रकल्पाच्या नांदेडकडच्या भागाच्या कामाची गती अत्यंत संथ आहे.

वर्धा ते कळंब ३८.६१ किलोमिटरच्या मार्गासाठी १९१० कोटींचा खर्च झाला. अजून २४६ किलोमिटरचे काम पूर्ण व्हायचे असून, त्यासाठी आणखी मोठ्या निधीची गरज आहे. मा. पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करीत असल्यामुळे आता उर्वरित कामालाही गती मिळेल आणि वर्षभराच्या आत हा प्रकल्प पूर्ण होऊन त्याचाही उद्घाटन सोहळा मा. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते होईल, असा आपला विश्वास असल्याचे डॉ. दर्डा म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी