शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन

By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2023 18:33 IST

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी आतातरी मौन सोडावे व देशाला उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गौरव वल्लभ यांच्या हस्ते पंतप्रधानांना विचारण्यात आलेल्या नऊ प्रश्नांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गौरव वल्लभ म्हणाले, राष्ट्रपती या देशाच्या पहिल्या नागरिक आहेत. मात्र, नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत असताना आदिवासी असलेल्या महिला राष्ट्रपतींना का बोलाविण्यात आले नाही, असा सवाल करीत केवळ उद्घाटनाच्या फलकावर राष्ट्रपतींचे नाव प्रथम व नंतर पंतप्रधानांचे नाव येईल म्हणून राष्ट्रपतींना बोलावणे टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २० पक्षांचे प्रतिनिधी या सोहळ्याला अनुपस्थित राहले तर लोकशाहीचा हा सोहळा पूर्ण होणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना लोकार्पणासाठी बोलवावे, आम्ही सर्व विरोधी पक्ष पहिल्या रांगेत उपस्थित राहून टाळ्या वाजवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मोदी हे राजधर्म वर चर्चा न करता राजदंडावर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमेश डांगे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.

असे आहे ९ प्रश्न

- १)गेल्या ९ वर्षात बेरोजगारी व महागाई एवढी का वाढली ?

२) कृषी उत्पन्न दुप्पट होणार होते ते फक्त ५ टक्केच का वाढले ?३) अदानींच्या कंपन्यांमध्ये शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले २० हजार कोटी कुणाचे आहेत ?

४) चीनच्या राष्ट्रपतींसोबत आजवर १८ वेळा बैठका होऊनही चीनही दीड हजार किलोमीटर भारतीय भूभागावर नियंत्रण कसे मिळविले आहे, भारतातील शहरांची नावे चीन का बदलत आहे ?५) द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी का घातले जात आहे ?

६) दलितांवरील अत्याचार २३ टक्क्यांनी का वाढले, जाती निहाय जनगनना का केली जात नाही ?७ ) लोकनियुक्त सरकार ईडी, सीबीआयचा दबाव टाकून पाडली जात आहेत. संविधान खिळखिळे करण्याचा प्रयत्न का करताय ?

८ ) मनरेगा सारख्या जनकल्याणाच्या योजनांच्या निधीत कपात का केली ?९ ) कोरोनात चुकीच्या नियोजनामुळे ४० लाख लोकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबियांना भरपाईच्या रुपात मदत का दिली नाही ?

टॅग्स :congressकाँग्रेस