शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन

By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2023 18:33 IST

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी आतातरी मौन सोडावे व देशाला उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गौरव वल्लभ यांच्या हस्ते पंतप्रधानांना विचारण्यात आलेल्या नऊ प्रश्नांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गौरव वल्लभ म्हणाले, राष्ट्रपती या देशाच्या पहिल्या नागरिक आहेत. मात्र, नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत असताना आदिवासी असलेल्या महिला राष्ट्रपतींना का बोलाविण्यात आले नाही, असा सवाल करीत केवळ उद्घाटनाच्या फलकावर राष्ट्रपतींचे नाव प्रथम व नंतर पंतप्रधानांचे नाव येईल म्हणून राष्ट्रपतींना बोलावणे टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २० पक्षांचे प्रतिनिधी या सोहळ्याला अनुपस्थित राहले तर लोकशाहीचा हा सोहळा पूर्ण होणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना लोकार्पणासाठी बोलवावे, आम्ही सर्व विरोधी पक्ष पहिल्या रांगेत उपस्थित राहून टाळ्या वाजवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मोदी हे राजधर्म वर चर्चा न करता राजदंडावर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमेश डांगे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.

असे आहे ९ प्रश्न

- १)गेल्या ९ वर्षात बेरोजगारी व महागाई एवढी का वाढली ?

२) कृषी उत्पन्न दुप्पट होणार होते ते फक्त ५ टक्केच का वाढले ?३) अदानींच्या कंपन्यांमध्ये शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले २० हजार कोटी कुणाचे आहेत ?

४) चीनच्या राष्ट्रपतींसोबत आजवर १८ वेळा बैठका होऊनही चीनही दीड हजार किलोमीटर भारतीय भूभागावर नियंत्रण कसे मिळविले आहे, भारतातील शहरांची नावे चीन का बदलत आहे ?५) द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी का घातले जात आहे ?

६) दलितांवरील अत्याचार २३ टक्क्यांनी का वाढले, जाती निहाय जनगनना का केली जात नाही ?७ ) लोकनियुक्त सरकार ईडी, सीबीआयचा दबाव टाकून पाडली जात आहेत. संविधान खिळखिळे करण्याचा प्रयत्न का करताय ?

८ ) मनरेगा सारख्या जनकल्याणाच्या योजनांच्या निधीत कपात का केली ?९ ) कोरोनात चुकीच्या नियोजनामुळे ४० लाख लोकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबियांना भरपाईच्या रुपात मदत का दिली नाही ?

टॅग्स :congressकाँग्रेस