शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

सरकारविरोधात प्राथमिक शिक्षक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:19 AM

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देबदली आणि आॅनलाईन कामाविरोधात शिक्षक रस्त्यावर : आम्हाला फक्त शिकवू द्याची दिली हाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला फक्त शिकवू द्या, असा आग्रह शिक्षकांनी प्रशासनाकडे केला.गेल्या सात ते आठ महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच होतात आणि जि.प.चे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या एकाच शासन निर्णयानुसार होतात. परंतु यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या स्वतंत्र शासन निर्णयानुसार आणि आॅनलाईन पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवले. सात आठ महीने उलटूनही बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान या बदली धोरणात काही दुरुस्ती कराव्यात या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. सरकार काहीही ऐकायला तयार नाही.दुसरीकडे मागील चार पाच वर्षापासून शिक्षकांच्या मागे आॅनलाईन कामाचा ससेमिरा सुरू आहे. शाळेत कोणत्याही साधनसुविधा नसताना अनेक अशैक्षणिक स्वरूपाची कामे आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांना करावी लागतात.ही कामे शिक्षकांकडून करणे थांबवावे व ती कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी या मागणीसाठी मागील काही दिवसापासून राज्यभर शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातच वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी बाबत जाचक अटी असलेला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला त्यामुळे शिक्षकांमधील असंतोष अधिकच वाढला.हा असंतोष आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहचला. त्या ठिकाणी झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली.मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केले. यात सुनील पेटकर, सुनील पाटील, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, शरद भांडारकर, शेषराव कांबळे, स्वाती लोन्हारे, मनोज घोडके, सुधाकर मते आदी वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी शासनाने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच संकलित चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.