शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

तूर डाळ आणि अन्य डाळींच्या किमती आकाशाला भिडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST

नागपूर : नवीन कायद्यानुसार मोठ्या कंपन्यांची साठेबाजी, सरकारची वाढलेली खरेदी, सरासरीपेक्षा कमी पीक आणि विदेशातून आयात कमी होत असल्याच्या ...

नागपूर : नवीन कायद्यानुसार मोठ्या कंपन्यांची साठेबाजी, सरकारची वाढलेली खरेदी, सरासरीपेक्षा कमी पीक आणि विदेशातून आयात कमी होत असल्याच्या कारणांनी गेल्या काही दिवसांपासून तूर डाळ आणि अन्य डाळींच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. कोरोना काळात खाद्यतेलासह सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने महागाईचा फटका गरीब आणि सामान्यांना बसत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.

होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले यंदा पीक कमी आल्याने सर्व प्रकारच्या डाळी महाग झाल्या आहेत. यातच मोठ्या कंपन्यांना डाळींचा साठा करीत आहेत. कोरोना काळात सर्व प्रकारच्या डाळींना मागणी वाढली आहे. म्यानमारमध्ये सैनिकी शासन असल्याने तेथून तुरीची आयात बंद आहे. शिवाय निर्यात सुरू असून सरकारने आयातीवर मर्यादा आणली आहे. भाववाढीनंतर बाजारात तूर, चना, मूग, उडद आदीं आधारभाव किमतीपेक्षा जास्त भावात विकल्या जात आहे. गावरानी तूर ७,८०० रुपये क्विंटल व आयातीत तुरीचे भाव ६,९०० रुपये क्विंटल तर चन्याचे ५,४०० रुपये भाव आहेत.

सर्व प्रकारच्या डाळींची हजार रुपयांपर्यंत वाढ

गेल्या काही दिवसांपासून तूर डाळ व चना डाळीचे भाव वाढत आहेत. सर्व डाळींच्या भावात ८०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरीची डाळ दर्जानुसार ९८ ते ११५ रुपये किलो, चना डाळ ६५ ते ८०, वाटाणा डाळ ७० ते ७५, मूग मोगर ९५ ते १२०, उडीद मोगर भाव ९० ते १३० रुपये, हिरवा वाटाणा १२५ ते १४० आणि काबुली चन्याचे ८५ ते ११० रुपये भाव आहेत.

तांदूळ व गव्हात तेजी

यंदा पावसामुळे पीक कमी आल्याने गहू आणि तांदळाच्या किमती प्रति क्विंटल ८०० ते हजार रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या किरकोळ धान्य बाजारात चिन्नोर दर्जानुसार ५६ ते ६५ रुपये किलो, जयश्रीराम ४७ ते ५३ रुपये, बीपीटी ३५ ते ४२ रुपये, बासमती ८५ ते १३० रुपये किलो आहे. याशिवाय गहू एमपी बोट ३२ ते ४४ रुपये किलो, लोकवन २५ ते २९ रुपये, मिल क्वालिटी २० ते २४ रुपये भाव आहेत.

मोटवानी म्हणाले, कोरोनामुळे धान्य बाजाराला ग्रहण लागले आहे. बाजारात ग्राहकांचा अभाव आहे. धंदे खराब असून वसुली होत नाही. अनेक व्यापा-यांची उधारी बुडाली आहे. लॉकडाऊन राहिले तर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. हातावर कमावून पोट भरणा-यांचा रोजगार गेला आहे. नवीन पीक दिवाळीत येणार आहे. त्यामुळे डाळी आणि धान्याचे भाव कमी होणार नाहीत.