शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वायदेबंदीमुळे कापूस, साेयाबीनसह आठ शेतमालाचे दर दबावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 08:00 IST

Nagpur News खाद्यतेल उत्पादक लाॅबीचा दबाव आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने एकूण आठ शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व शेतमालाचे दर दबावात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देसर्व तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांचा समावेशएक वर्षाची पुन्हा मुदतवाढ

सुनील चरपे

नागपूर : खाद्यतेल उत्पादक लाॅबीचा दबाव आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने एकूण आठ शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. यातील सात शेतमालाच्या वायदाबंदीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, तर कापसावरील वायदाबंदी ही तात्पुरती व अनिश्चितकालीन आहे. त्यामुळे या सर्व शेतमालाचे दर दबावात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचा हवाला देत तेलबिया, खाद्यतेल आणि डाळवर्गीय पिकांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आधी ‘स्टाॅक लिमिट’ या शस्त्राचा वापर केला. एवढेच नव्हे, तर ‘सेबी’ने २१ डिसेंबर, २०२१ राेजी तेलबिया, डाळवर्गीय पिकांसह गहू आणि तांदळाच्या फ्युचर मार्केटमधील वायद्यांवर बंदी घतली. २० डिसेंबर, २०२२ राेजी ही बंदी संपण्याच्या आधीच याला एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यामुळे या शेतमालाचे २२ डिसेंबर, २०२३ पर्यंत वायदे बंद राहणार आहेत.

वायदे बंद असल्याने शेतमालाचे दर दबावात आले आहेत. जागतिक बाजारात साेयाबीन व माेहरीचे दर वाढत असताना, साेयाबीनला सरासरी ५,००० तर माेहरीला ५,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. वायदे सुरू असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरापेक्षा किमान ५०० ते ९०० रुपये अधिक मिळाले असते, अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली.

वायदेबंदी असलेले शेतमाल

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ने वायदेबंदी केलेल्या शेतमालामध्ये साेयाबीन, साेयातेल व साेया ढेप, माेहरी, माेहरी तेल व माेहरी ढेप, गहू, तांदूळ (बासमती वगळून), हरभरा, मूग आणि कच्चे पामतेल या शेतमालाचा समावेश आहे. कापसाच्या वायद्यांवर ‘सेबी’ने तात्पुरती बंदी घातली आहे. तुरीवर असलेली वायदेबंदी आठ वर्षांपासून कायम आहे.

कापूस, साेयाबीन दरात एक हजाराची घसरण

वायदेबंदीमुळे व्यापारी व शेतकऱ्यांना त्या शेतमालाची भविष्यातील संदर्भ किमतीबाबत माहिती मिळत नाही. गुंतवणूक थांबल्याने व्यापाऱ्यांनी चढ्या दराने खरेदी करणे थांबविले आहे. भारतात साेया ढेपेचे दर कमी असताना पाहिजे त्या प्रमाणात निर्यात हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साेयाबीन सहा हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये दराने तर कापूस नऊ हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये प्रति क्विंटल विकावा लागत आहे. सध्या सरकीचा चांगला दर मिळत असल्याने कापसाचे दर टिकून आहेत.

टॅग्स :agricultureशेती