शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

वायदेबंदीमुळे कापूस, साेयाबीनसह आठ शेतमालाचे दर दबावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 08:00 IST

Nagpur News खाद्यतेल उत्पादक लाॅबीचा दबाव आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने एकूण आठ शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व शेतमालाचे दर दबावात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देसर्व तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांचा समावेशएक वर्षाची पुन्हा मुदतवाढ

सुनील चरपे

नागपूर : खाद्यतेल उत्पादक लाॅबीचा दबाव आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने एकूण आठ शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. यातील सात शेतमालाच्या वायदाबंदीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, तर कापसावरील वायदाबंदी ही तात्पुरती व अनिश्चितकालीन आहे. त्यामुळे या सर्व शेतमालाचे दर दबावात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचा हवाला देत तेलबिया, खाद्यतेल आणि डाळवर्गीय पिकांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आधी ‘स्टाॅक लिमिट’ या शस्त्राचा वापर केला. एवढेच नव्हे, तर ‘सेबी’ने २१ डिसेंबर, २०२१ राेजी तेलबिया, डाळवर्गीय पिकांसह गहू आणि तांदळाच्या फ्युचर मार्केटमधील वायद्यांवर बंदी घतली. २० डिसेंबर, २०२२ राेजी ही बंदी संपण्याच्या आधीच याला एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यामुळे या शेतमालाचे २२ डिसेंबर, २०२३ पर्यंत वायदे बंद राहणार आहेत.

वायदे बंद असल्याने शेतमालाचे दर दबावात आले आहेत. जागतिक बाजारात साेयाबीन व माेहरीचे दर वाढत असताना, साेयाबीनला सरासरी ५,००० तर माेहरीला ५,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. वायदे सुरू असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरापेक्षा किमान ५०० ते ९०० रुपये अधिक मिळाले असते, अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली.

वायदेबंदी असलेले शेतमाल

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ने वायदेबंदी केलेल्या शेतमालामध्ये साेयाबीन, साेयातेल व साेया ढेप, माेहरी, माेहरी तेल व माेहरी ढेप, गहू, तांदूळ (बासमती वगळून), हरभरा, मूग आणि कच्चे पामतेल या शेतमालाचा समावेश आहे. कापसाच्या वायद्यांवर ‘सेबी’ने तात्पुरती बंदी घातली आहे. तुरीवर असलेली वायदेबंदी आठ वर्षांपासून कायम आहे.

कापूस, साेयाबीन दरात एक हजाराची घसरण

वायदेबंदीमुळे व्यापारी व शेतकऱ्यांना त्या शेतमालाची भविष्यातील संदर्भ किमतीबाबत माहिती मिळत नाही. गुंतवणूक थांबल्याने व्यापाऱ्यांनी चढ्या दराने खरेदी करणे थांबविले आहे. भारतात साेया ढेपेचे दर कमी असताना पाहिजे त्या प्रमाणात निर्यात हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साेयाबीन सहा हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये दराने तर कापूस नऊ हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये प्रति क्विंटल विकावा लागत आहे. सध्या सरकीचा चांगला दर मिळत असल्याने कापसाचे दर टिकून आहेत.

टॅग्स :agricultureशेती