शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

नागपुरात हरभरा आणि तूर डाळीचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:03 IST

कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत.

ठळक मुद्दे हरभरा व तुरीची आवक वाढली : तांदळाचे भाव स्थिर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. १५ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे एक हजार आणि हरभरा डाळीचे भाव ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. निर्यातबंदीमुळे भाव वाढले नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.१५ दिवसांपूर्वी ठोक बाजारात दर्जानुसार ७५ ते ९० रुपये किलो असलेली तुरीची डाळ ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय हरभरा डाळ ५४ ते ५६ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेसनाचे भावही कमी झाले आहेत.अडतिया रमेश उमाठे यांनी सांगितले की, तसे पाहता यावर्षी तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार नाहीत, पण बाजारात नवीन माल येण्याच्या वृत्ताने पूर्वीच भाव कमी झाले आहेत. १५ दिवसानंतर बाजारात मालाच्या आवकीचे प्रमाण पाहता भाव पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. यावर्षी उडद आणि मुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मूग ठोकमध्ये प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये आणि मूग मोगर ९८ ते १०७ रुपयांवर पोहोचले आहेत. दहीवड्यासाठी उपयोगात येणाऱ्या उडद मोगरचे भाव गेल्या वर्षी १३५ रुपयांवर पोहोचले होते. पण उठाव नसल्यामुळे भाव कमी झाले. सध्या ९० ते ११५ रुपयांवर स्थिर आहेत. याशिवाय वाटाणा डाळीचे भाव कमी होऊन ठोकमध्ये प्रति क्विंटल ४ हजारांवर स्थिरावले आहेत. मोट प्रति किलो ६५ ते ८० रुपये आणि काबुली चणा ६५ ते ९० रुपये भाव आहेत.तांदळाची आवक वाढली, भाव स्थिरयावर्षी तांदळाचे उत्पादन चांगले असून बाजारात मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून जयश्रीराम आणि चिन्नोर तांदळाची सर्वाधिक मागणी असते. ठोकमध्ये श्रीराम तांदूळ दर्जानुसार प्रति क्विंटल ३८०० ते ४४०० रुपये आणि चिन्नोर ४३०० ते ४५०० रुपये भाव आहेत. त्याखालोखाल सुवर्णा २५०० ते २७००, बीपीटी ३ हजार ते ४४००, एचएमटी ३४०० ते ३६०० भाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून जयप्रकाश आणि शिवपार्वती या वाणाचे तांदूळ बाजारात येत आहे. भाव प्रति किलो ६० रुपये आहे.

टॅग्स :foodअन्नMarketबाजारnagpurनागपूर