शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नागपुरात हरभरा आणि तूर डाळीचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:03 IST

कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत.

ठळक मुद्दे हरभरा व तुरीची आवक वाढली : तांदळाचे भाव स्थिर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. १५ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे एक हजार आणि हरभरा डाळीचे भाव ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. निर्यातबंदीमुळे भाव वाढले नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.१५ दिवसांपूर्वी ठोक बाजारात दर्जानुसार ७५ ते ९० रुपये किलो असलेली तुरीची डाळ ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय हरभरा डाळ ५४ ते ५६ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेसनाचे भावही कमी झाले आहेत.अडतिया रमेश उमाठे यांनी सांगितले की, तसे पाहता यावर्षी तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार नाहीत, पण बाजारात नवीन माल येण्याच्या वृत्ताने पूर्वीच भाव कमी झाले आहेत. १५ दिवसानंतर बाजारात मालाच्या आवकीचे प्रमाण पाहता भाव पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. यावर्षी उडद आणि मुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मूग ठोकमध्ये प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये आणि मूग मोगर ९८ ते १०७ रुपयांवर पोहोचले आहेत. दहीवड्यासाठी उपयोगात येणाऱ्या उडद मोगरचे भाव गेल्या वर्षी १३५ रुपयांवर पोहोचले होते. पण उठाव नसल्यामुळे भाव कमी झाले. सध्या ९० ते ११५ रुपयांवर स्थिर आहेत. याशिवाय वाटाणा डाळीचे भाव कमी होऊन ठोकमध्ये प्रति क्विंटल ४ हजारांवर स्थिरावले आहेत. मोट प्रति किलो ६५ ते ८० रुपये आणि काबुली चणा ६५ ते ९० रुपये भाव आहेत.तांदळाची आवक वाढली, भाव स्थिरयावर्षी तांदळाचे उत्पादन चांगले असून बाजारात मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून जयश्रीराम आणि चिन्नोर तांदळाची सर्वाधिक मागणी असते. ठोकमध्ये श्रीराम तांदूळ दर्जानुसार प्रति क्विंटल ३८०० ते ४४०० रुपये आणि चिन्नोर ४३०० ते ४५०० रुपये भाव आहेत. त्याखालोखाल सुवर्णा २५०० ते २७००, बीपीटी ३ हजार ते ४४००, एचएमटी ३४०० ते ३६०० भाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून जयप्रकाश आणि शिवपार्वती या वाणाचे तांदूळ बाजारात येत आहे. भाव प्रति किलो ६० रुपये आहे.

टॅग्स :foodअन्नMarketबाजारnagpurनागपूर