शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोशल मीडियावरील पेपरफुटीला बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:07 IST

सोशल मीडियावर पेपरफुटीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. त्यामुळे बोर्डाची बदनामी होत होती. यावर उपाय म्हणून बोर्डाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वर्गातच विद्यार्थ्यांपुढे पेपरच्या पाकिटाचे सील उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवर्गातच उघडणार पेपर पाकिटाचे सील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर पेपरफुटीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. त्यामुळे बोर्डाची बदनामी होत होती. यावर उपाय म्हणून बोर्डाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वर्गातच विद्यार्थ्यांपुढे पेपरच्या पाकिटाचे सील उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देशही दिले आहे.येत्या १८ फेब्रुवारीपासून बारावी व ३ मार्चपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीवर आळा घालण्यासाठी व पेपरफुटीच्या प्रकारावर निर्बंध लावण्यासाठी बोर्डाने काही उपाययोजना केल्या आहेत. यात वर्गातच पेपर पाकीट उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय परिरक्षकाला सहा. परिवेक्षकाच्या नियुक्तीचे तसेच सहा. परिवेक्षक इतर केंद्रावर बदलण्याचे आदेश दिले आहे. तसेच बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेतसुद्धा एक्स्टरर्नल म्हणून पाठविणाºया शिक्षकांची शहर आणि ग्रामीण भागात विभागणी केली आहे.

आंतरिक गुणांचा समावेश केल्याने निकालात वाढदहावीच्या परीक्षेचा पॅटर्न ८०-२० असा असून, ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांचे आंतरिक मूल्यमापन करण्यात येणार आहे. यावर्षी पुन्हा एकदा आंतरिक गुणांचा समावेश करण्यात आल्याने निकालात वाढ होण्याची शक्यता आहे.

बारावीची १,६८,५०८ व दहावीची १,८७,७९७ विद्यार्थी देणार परीक्षानागपूर बोर्डाअंतर्गत बारावीची परीक्षा १,६८,५०८ विद्यार्थी देणार आहेत. यात विद्यार्थ्यांची संख्या ८७,४९७ व विद्यार्थिनींची संख्या ८१,००१ व १० तृतीयपंथी आहेत. तर दहावीचे १,८७,७९७ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होणार असून, यात ९९,७३६ विद्यार्थी व ८७,०४९ विद्यार्थिनी व १२ तृतीयपंथी आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा