शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोहर’ साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

By प्रविण खापरे | Updated: October 14, 2022 20:29 IST

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत.

नागपूर: कुशल साहित्यसंघटक म्हणून सर्वपरिचित असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहिण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. 

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावाने ते अनेकांची मने जिंकून घेत असत. त्याचमुळे, त्यांच्या निधनाने साहित्यसंघटन क्षेत्रातील ‘मनोहर’ व्यक्तिमत्त्व हरवल्याची शोककळा साहित्य वर्तुळात पसरली आहे.

मनोहर म्हैसाळकर हे दीर्घकाळापासून मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. याच आजारामुळे त्यांना गुरुवारी १३ ऑक्टोबराला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता अखेरचा श्वास घेतला.  प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २००६ साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. तेव्हापासून ते आजतागायत मनोहर म्हैसाळकर आणि विदर्भ साहित्य संघ एकमेकांना पर्याय झाले होते. मनोहर म्हैसाळकरांचे कार्य केवळ विदर्भ साहित्य संघापुरतेच मर्यादित नव्हते तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्नित बृहन्महाराष्ट्रातील सर्व संस्थांमध्ये त्यांचा पगडा होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन असो वा साहित्य संमेलनाचे अध्यक्षांची निवड असो, त्यांची भूमिका कायम निर्णायक ठरली आहे. त्यांचा हा दराराच विदर्भ साहित्य संघाला अग्रणी स्थान प्राप्त करवून देणारा ठरला आहे. त्यांच्या कार्याचा आवाका आणि साहित्यसंघटन कौशल्य बघूनच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांचा २०२१-२२चा ‘प्राचार्य राम शेवाळकर’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. २००० साली अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने त्यांना पहिल्या भाऊसाहेब स्मृती ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित केले होते. १९९९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेने त्यांना मराठी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट व ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने गौरवान्वित केले होते. २००६ साली त्यांना मानव मंदिर नागपूर या संस्थेने प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय, त्यांना विविध संस्था, संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :nagpurनागपूर