शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:42 IST

अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत.

ठळक मुद्देआशिष बैनलवार क्वॉरंटाईन सेंटरमधून रुग्णांची घेत आहेत काळजी

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत. एकीकडे या युद्धात ते आघाडीवर आहेत आणि दुसरीकडे याच आघाडीवरील योद्धयांना आपमतलबी लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ही वैद्यकीय आघाडी आपल्या कर्तव्यापासून जराही डगमगलेली नाही. संसर्गाच्या सावटातही ही आघाडी मैदानात दटून आहे आणि एखाद्या वॉरिअर प्रमाणे महाभयंकर अशा कोरोना नावाच्या सुक्ष्म दैत्याची दोन दोन हात करत अडिगतेने उभे आहेत. यापैकी काहींना तर एकाच वेळी दोन दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. एक क्वॉरंटाईन सेंटर अन् दुसरे कुटूंब! तरी देखील ते जराही खजिल पडलेले नाही आणि या दोन्ही आघाड्या ते लिलया पेलत असल्याचे दिसून येते.शहरात कोरोनाचा जसा शिरकाव झाला तशा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या. डॉक्टरांची फळीही उभी झाली आणि अल्पावधितच सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला प्रमुख क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. या सेंटरमध्ये युद्धपातळीवर संशयितांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. याच कार्यात नागपूरचे युवा चिकित्सक डॉ. आशिष बैनलवार आहेत. त्यांच्यासारखे अनेक आहेत. डॉ. आशिष यांच्या पत्नी प्रेग्नंट असून, नववा महिना लागला आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे लवकरच एका रत्नाचे आगमन होणार आहे. तर त्यांचे वडील अपलॅस्टिक एनिमियाने ग्रस्त आहेत. या आजारात त्यांना सतत कृत्रित रक्तपुरवठा करावा लागतो. अशा स्थितीत पती म्हणून पत्नीची काळजी घेणे आणि एक पुत्र म्हणून वडिलांची देखरेख करणे, हे आद्य कर्तव्य आहे. शिवाय, त्यांना एक पाच वर्षाची मुलगी देखील आहे आणि तिच्याकडेही एक बाप म्हणून लक्ष पुरविणे आलेच. अशा स्थितीतही डॉ. आशिष आपल्या डॉक्टर या सर्वप्रथम कर्तव्याचे निर्वहन करत आहेत, हे विशेष आणि हिच बाब रुग्ण आणि लॉकडाऊनच्या काळात कायद्या धाब्यावर बसवणाऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. डॉ. आशिष हे १८ मार्चपासूनच या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये इतर सहकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. आशिष यांच्यासारखेच अनेक डॉक्टर एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळत आपले कर्तव्य बजावत आहेत, हे विशेष.शासनाचे प्रोटोकॉल पाळा - आशिष बैनलवार: या स्थितीत नागरिकांनी शासनाशिवाय कुणाचेच प्रोटोकॉल पाळू नये. लॉकडाऊनचे पूर्ण पालन करा अन्यथा अंतिम प्रवासाला लागा, अशीच वर्तमान स्थिती आहे. अत्यंत मजबूत अशी वैद्यकीय क्षमता असलेल्या अमेरिका, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले, ते आपण काहीच नाही. तरी देखील शासनाने लागलिच केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अजूनही मजबूत आहे. त्याचा विचार करावा, असे आवाहन डॉ. आशिष बैनलवार यांनी क्वॉरंटाईन सेंटरमधून केले आहे.घरी जातो पण कुणाशीच भेटत नाही: दररोज घरी गेलो की आपल्या खोलित स्वत:ला बंद करून घेतो. वडील घरी आहेत, त्यांच्याकडे सतत लक्ष पुरवावेच लागते. दररोज रक्त बदलून घ्यावे लागते. पत्नीला माहेरी पाठवले आहे. मात्र, दररोज फोनवर बोलणे होत असते, असे डॉ. आशिष यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस