शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:42 IST

अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत.

ठळक मुद्देआशिष बैनलवार क्वॉरंटाईन सेंटरमधून रुग्णांची घेत आहेत काळजी

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत. एकीकडे या युद्धात ते आघाडीवर आहेत आणि दुसरीकडे याच आघाडीवरील योद्धयांना आपमतलबी लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ही वैद्यकीय आघाडी आपल्या कर्तव्यापासून जराही डगमगलेली नाही. संसर्गाच्या सावटातही ही आघाडी मैदानात दटून आहे आणि एखाद्या वॉरिअर प्रमाणे महाभयंकर अशा कोरोना नावाच्या सुक्ष्म दैत्याची दोन दोन हात करत अडिगतेने उभे आहेत. यापैकी काहींना तर एकाच वेळी दोन दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. एक क्वॉरंटाईन सेंटर अन् दुसरे कुटूंब! तरी देखील ते जराही खजिल पडलेले नाही आणि या दोन्ही आघाड्या ते लिलया पेलत असल्याचे दिसून येते.शहरात कोरोनाचा जसा शिरकाव झाला तशा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या. डॉक्टरांची फळीही उभी झाली आणि अल्पावधितच सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला प्रमुख क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. या सेंटरमध्ये युद्धपातळीवर संशयितांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. याच कार्यात नागपूरचे युवा चिकित्सक डॉ. आशिष बैनलवार आहेत. त्यांच्यासारखे अनेक आहेत. डॉ. आशिष यांच्या पत्नी प्रेग्नंट असून, नववा महिना लागला आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे लवकरच एका रत्नाचे आगमन होणार आहे. तर त्यांचे वडील अपलॅस्टिक एनिमियाने ग्रस्त आहेत. या आजारात त्यांना सतत कृत्रित रक्तपुरवठा करावा लागतो. अशा स्थितीत पती म्हणून पत्नीची काळजी घेणे आणि एक पुत्र म्हणून वडिलांची देखरेख करणे, हे आद्य कर्तव्य आहे. शिवाय, त्यांना एक पाच वर्षाची मुलगी देखील आहे आणि तिच्याकडेही एक बाप म्हणून लक्ष पुरविणे आलेच. अशा स्थितीतही डॉ. आशिष आपल्या डॉक्टर या सर्वप्रथम कर्तव्याचे निर्वहन करत आहेत, हे विशेष आणि हिच बाब रुग्ण आणि लॉकडाऊनच्या काळात कायद्या धाब्यावर बसवणाऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. डॉ. आशिष हे १८ मार्चपासूनच या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये इतर सहकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. आशिष यांच्यासारखेच अनेक डॉक्टर एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळत आपले कर्तव्य बजावत आहेत, हे विशेष.शासनाचे प्रोटोकॉल पाळा - आशिष बैनलवार: या स्थितीत नागरिकांनी शासनाशिवाय कुणाचेच प्रोटोकॉल पाळू नये. लॉकडाऊनचे पूर्ण पालन करा अन्यथा अंतिम प्रवासाला लागा, अशीच वर्तमान स्थिती आहे. अत्यंत मजबूत अशी वैद्यकीय क्षमता असलेल्या अमेरिका, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले, ते आपण काहीच नाही. तरी देखील शासनाने लागलिच केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अजूनही मजबूत आहे. त्याचा विचार करावा, असे आवाहन डॉ. आशिष बैनलवार यांनी क्वॉरंटाईन सेंटरमधून केले आहे.घरी जातो पण कुणाशीच भेटत नाही: दररोज घरी गेलो की आपल्या खोलित स्वत:ला बंद करून घेतो. वडील घरी आहेत, त्यांच्याकडे सतत लक्ष पुरवावेच लागते. दररोज रक्त बदलून घ्यावे लागते. पत्नीला माहेरी पाठवले आहे. मात्र, दररोज फोनवर बोलणे होत असते, असे डॉ. आशिष यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस