शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:01 IST

चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.

ठळक मुद्देनिवडीने सर्वत्र आनंद : ‘किरवंत’काराचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.ज्येष्ठ नाटककार म्हणून महाराष्ट्रातील साहित्य विश्वात त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते. गावातच प्राथमिक शिक्षण व पुढे नागपूरला महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास केल्यानंतर मुंबईला त्यांनी नोकरी स्वीकारली. तसे लहानपणापासूनच कथा व कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नोकरीत असताना स्पर्धेला नाटक पाठवायचे, या आग्रहाने ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे लेखन केल्यानंतर हा नाट्यप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. शहरात राहूनही त्यांचे गाव कायम त्यांच्या मनात शिरलेलं. म्हणूनच ६०-६५ वर्षापूर्वीचं त्यांच गाव आधुनिक काळात पुरते बदलल्याची, कधी शुद्ध हवा देणाऱ्या गावातही प्रदुषण पसरल्याची खंत त्यांच्या मनात येते. या गावाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकातही झळकत राहिले.वेठबिगारांच्या जीवनातला संघर्ष मांडणाऱ्या‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग लंडनला झाला. त्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. पुढे व्यवसायिक रंगभूमीवर झालेल्या प्रयोगात अभिनेता नाना पाटेकर यांनी अभिनय केला. स्मशानकर्मे पार पाडणाऱ्या ब्राम्हण वर्गाच्या जीवनाचा वेध घेणारे ‘किरवंत’ हे नाटक असेच लोकप्रिय ठरले. ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांनी व्यवसायिक रंगभूमीवर या नाटकाच्या प्रयोगाचे दिग्दर्शन व अभिनयही केला. त्यांच्या ‘देवनगरी, वांझमाती, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, गांधी - आंबेडकर, रंगयात्री, शुद्ध बिजापोटी, अभिजात जंतू, दि बुद्धा, छावणी’ या नाटकांनाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादही झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्कारासह २५ पेक्षा जास्त पुरस्कार विविध साहित्यकृतीसाठी त्यांना प्राप्त झाले आहेत. लहानपणापासून जगलेले जीवन हीच आपली भूमिका असल्याचे सांगताना गेल्या ४५ वर्षापासून रंगभूमीची सेवा केल्यानंतर मिळालेला हा सन्मान आनंद देणारा आहे, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य