शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:01 IST

चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.

ठळक मुद्देनिवडीने सर्वत्र आनंद : ‘किरवंत’काराचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.ज्येष्ठ नाटककार म्हणून महाराष्ट्रातील साहित्य विश्वात त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते. गावातच प्राथमिक शिक्षण व पुढे नागपूरला महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास केल्यानंतर मुंबईला त्यांनी नोकरी स्वीकारली. तसे लहानपणापासूनच कथा व कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नोकरीत असताना स्पर्धेला नाटक पाठवायचे, या आग्रहाने ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे लेखन केल्यानंतर हा नाट्यप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. शहरात राहूनही त्यांचे गाव कायम त्यांच्या मनात शिरलेलं. म्हणूनच ६०-६५ वर्षापूर्वीचं त्यांच गाव आधुनिक काळात पुरते बदलल्याची, कधी शुद्ध हवा देणाऱ्या गावातही प्रदुषण पसरल्याची खंत त्यांच्या मनात येते. या गावाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकातही झळकत राहिले.वेठबिगारांच्या जीवनातला संघर्ष मांडणाऱ्या‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग लंडनला झाला. त्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. पुढे व्यवसायिक रंगभूमीवर झालेल्या प्रयोगात अभिनेता नाना पाटेकर यांनी अभिनय केला. स्मशानकर्मे पार पाडणाऱ्या ब्राम्हण वर्गाच्या जीवनाचा वेध घेणारे ‘किरवंत’ हे नाटक असेच लोकप्रिय ठरले. ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांनी व्यवसायिक रंगभूमीवर या नाटकाच्या प्रयोगाचे दिग्दर्शन व अभिनयही केला. त्यांच्या ‘देवनगरी, वांझमाती, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, गांधी - आंबेडकर, रंगयात्री, शुद्ध बिजापोटी, अभिजात जंतू, दि बुद्धा, छावणी’ या नाटकांनाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादही झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्कारासह २५ पेक्षा जास्त पुरस्कार विविध साहित्यकृतीसाठी त्यांना प्राप्त झाले आहेत. लहानपणापासून जगलेले जीवन हीच आपली भूमिका असल्याचे सांगताना गेल्या ४५ वर्षापासून रंगभूमीची सेवा केल्यानंतर मिळालेला हा सन्मान आनंद देणारा आहे, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य