शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

प्रवीण दवणेंचे नागपुरात ‘सर्जिकल स्ट्राइक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 03:23 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे

मिशन इलेक्शन : तीन दिवसीय मुक्कामात साहित्यिकांशी भेटीगाठी नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे असे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’ स्टाईलने नागपुरात डेरेदाखल झाले असून या तीन दिवसीय मुक्कामात ते साहित्यिकांशी भेटीघाटी घेत निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. बुधवारी नागपुरात पोहोचलेल्या दवणे यांनी महामंडळाकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. हा माझा प्रचार दौरा नाही. पण, नागपुरात आलोच आहे तर भेटीगाठी या होणारच आणि भेट झाली तर निवडणुकीच्या चर्चेशिवाय ती कशी पूर्ण होईल, असा प्रतिप्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित करून त्यांनी नागपूर भेटीचे ‘प्रयोजन’ सांगितले. मी ही निवडणूक लौकिकासाठी लढत नाहीये. भाषा, संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या डोक्यात आदर्श संमेलनाची जी कल्पना आहे ती वास्तवात उतरावी, हे संमेलन संवेदनेचा, समन्वयाचा उत्सव व्हावा, तरुणाईच्या मनात वाङ्मयीन उमेद जागवता यावी, हा माझा प्रयत्न आहे. मी उद्या जर संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आलो तर या संमेलनाचा चेहरा तरुण होणार हे नक्की आहे. मला व एकूणच साहित्य विश्वाला हेच हवे आहे, याकडेही दवणे यांनी विशेष लक्ष वेधले. (प्रतिनिधी)पहिला आणि अखेरचा प्रयत्नमी मनाच्या सुप्त तारांना अलवार शब्दांनी झंकारणारा कवी आहे. निवडणूक, राजकारण हा माझा पिंड नाही. साहित्य क्षेत्रातील माझ्या थोड्या-अधिक योगदानाच्या बळावर मी मराठी साहित्य संमेलनाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात यश मिळते की अपयश याची मला पर्वा नाही. हा माझा पहिला नि शेवटचा प्रयत्न आहे. निवडून आलो तर अध्यक्ष म्हणून माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या वास्तवात उतरविण्यासाठी प्रयत्न करेल आणि यश नाहीच मिळाले तर पुन्हा लिखाणाच्या कामात स्वत:ला गुंंतवून घेईल. तिकडेही खूप काम करायचे अजून बाकी आहे.डॉ. काळेंचे काम मोठेचया निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी असले तरी डॉ. अक्षयकुमार काळे यांचे समीक्षेच्या क्षेत्रातील काम मोठेच आहे. ते नागपूर-विदर्भाचे असल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याप्रती विशेष आस्था असणे स्वाभाविक आहे. परंतु मी भौगोलिक सीमा मानत नाही. मराठी साहित्याच्या जागर करीत मी देशभर फिरत असतो. त्यामुळे नागपूर-विदर्भातही माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेतच. त्यांची साथ मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.