शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 21:36 IST

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते

मुंबई/नागपूर - राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा यापूर्वी सातत्याने सामना झाला आहे. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही २०१९ पर्यंत असेच चित्र होते. मात्र, २०१९ नंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना, भाजपाने थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणातून शरद पवारांनाच लक्ष्य केलं. आता, २०२४ च्या निवडणुकीतही भाजपाकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. त्यावर, आता शरद पवारांनी थेट पलटवार केला. तसेच, फडणवीसांना पवारस्टाईल टोलाही लगावला.  

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते. वर्ध्यातून महाविकास आघाडीच्यावतीने अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, यवतमाळमधून संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांकडून, त्यातही भाजपाकडून शरद पवार यांना लक्ष्य करुन प्रचार केला जात आहे. शरद पवारांचे राजकारण संपलेय, असेही बोलले जाते, यासंदर्भातील प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी पवारस्टाईल उत्तर देत फडणवीसांच्या जुन्या भाषणाची आणि २०१९ मध्ये बदललेल्या समीकरणाची आठवण करुन दिली. 

महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. 

दरम्यान, २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी, शरद पवार साहब की राजनिती ईरा खतम हो गया, असे म्हणत शरद पवारांचा राजकीय वठ आता संपल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. अर्थात, शरद पवारांनी त्यावर कुठलंही उत्तर दिलं नाही. मात्र, २०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४DhuleधुळेElectionनिवडणूक