शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 21:36 IST

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते

मुंबई/नागपूर - राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा यापूर्वी सातत्याने सामना झाला आहे. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही २०१९ पर्यंत असेच चित्र होते. मात्र, २०१९ नंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना, भाजपाने थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणातून शरद पवारांनाच लक्ष्य केलं. आता, २०२४ च्या निवडणुकीतही भाजपाकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. त्यावर, आता शरद पवारांनी थेट पलटवार केला. तसेच, फडणवीसांना पवारस्टाईल टोलाही लगावला.  

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते. वर्ध्यातून महाविकास आघाडीच्यावतीने अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, यवतमाळमधून संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांकडून, त्यातही भाजपाकडून शरद पवार यांना लक्ष्य करुन प्रचार केला जात आहे. शरद पवारांचे राजकारण संपलेय, असेही बोलले जाते, यासंदर्भातील प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी पवारस्टाईल उत्तर देत फडणवीसांच्या जुन्या भाषणाची आणि २०१९ मध्ये बदललेल्या समीकरणाची आठवण करुन दिली. 

महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. 

दरम्यान, २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी, शरद पवार साहब की राजनिती ईरा खतम हो गया, असे म्हणत शरद पवारांचा राजकीय वठ आता संपल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. अर्थात, शरद पवारांनी त्यावर कुठलंही उत्तर दिलं नाही. मात्र, २०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४DhuleधुळेElectionनिवडणूक