शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 01:56 IST

काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : काँग्रेसने सत्तेत असताना पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केल. त्याचाच परिणाम आज भोगावा लागतोय. पक्षसंघटन मजबूत व्हावे यासाठी काँग्रेस सेवादलाची स्थापना झाली. त्याचीच कॉपी आरएसएसने केली. मात्र काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़

बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते?नीतीभ्रष्ट राजकारण सुरू आहे. राजकारणामुळे गरिबांचे प्रश्न सुटत असतील तर स्तर चांगला, अन्यथा खालावलेला समजावा, या मताचा मी आहे. मुळात राजकीय मंडळींचा स्तर खाली आला, म्हणून राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसत आहे. सध्या निवडणुकांच्या तोंडावर कारवाया होताना दिसत आहेत. एवढी वर्षे का झोपले होतात ? राजकारण द्वेषाचे नसावे. सत्ता सर्वकाळ नसते, हे समजून घ्यावे.

पक्षांतराबद्दल काय वाटते ?पक्ष सोडून जाणारे निष्ठावंत कधीच नव्हते, तर स्वार्थात रमलेले होते. जाणारे जर पिढीजात असतील तर पक्षाचा मूळ विचार कुठे गेला? याचाच अर्थ ते संधिसाधू होते.

सध्याच्या कामगार धोरणांबद्दल काय वाटते ?धोरण वाईट नाही, पण कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी उद्योजकांच्या फायद्यावर चर्चा होणे वाईट आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन वर्गात कामगार विभागला आहे. असंघटित कामगारांच्या हितरक्षणासाठी सरकारने संरक्षण देण्याची गरज आहे. आवश्यक तिथे नवे कायदेही व्हावे.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला हरताळ का फासला जातोय ?सत्तेची मेनका भल्याभल्यांंना आकर्षित करते. विदर्भाचे आंदोलन करणारे नेते राजकारणाला बळी पडले. चळवळ खिळखिळी झाली, हा इतिहास आहे. त्यामुळे विदर्भाच्या मागणीवरून आणि आंदोलनावरून जनतेचा विश्वास उडाला. भाजपाने जाहीरनाम्यात विदर्भ राज्यनिर्मितीचे आश्वासन दिले होते. आता त्याचे उत्तर मागण्यासाठी जोर हवा. कोणतेही आंदोलन लोकशक्तीवर असते. उद्दिष्टासाठी त्यागाची गरज असते.

विदर्भाच्या औद्योगिक सक्षमतेसाठी काय हवे ?विदर्भातील बेकारीचा विचार करून रोजगारप्रधान उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. आधुनिकीकरण आणि तांत्रिक सक्षमतेतून विकास होईल, पण बेकारी दूर होणार नाही. हा विकास मर्यादित असेल. असे विकासाचे धोरण चुकीचे आहे. मिहानकडून विदर्भाला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याची अपेक्षेप्रमाणे प्रगती व्हायला हवी़

टॅग्स :congressकाँग्रेस