शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 01:56 IST

काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : काँग्रेसने सत्तेत असताना पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केल. त्याचाच परिणाम आज भोगावा लागतोय. पक्षसंघटन मजबूत व्हावे यासाठी काँग्रेस सेवादलाची स्थापना झाली. त्याचीच कॉपी आरएसएसने केली. मात्र काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़

बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते?नीतीभ्रष्ट राजकारण सुरू आहे. राजकारणामुळे गरिबांचे प्रश्न सुटत असतील तर स्तर चांगला, अन्यथा खालावलेला समजावा, या मताचा मी आहे. मुळात राजकीय मंडळींचा स्तर खाली आला, म्हणून राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसत आहे. सध्या निवडणुकांच्या तोंडावर कारवाया होताना दिसत आहेत. एवढी वर्षे का झोपले होतात ? राजकारण द्वेषाचे नसावे. सत्ता सर्वकाळ नसते, हे समजून घ्यावे.

पक्षांतराबद्दल काय वाटते ?पक्ष सोडून जाणारे निष्ठावंत कधीच नव्हते, तर स्वार्थात रमलेले होते. जाणारे जर पिढीजात असतील तर पक्षाचा मूळ विचार कुठे गेला? याचाच अर्थ ते संधिसाधू होते.

सध्याच्या कामगार धोरणांबद्दल काय वाटते ?धोरण वाईट नाही, पण कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी उद्योजकांच्या फायद्यावर चर्चा होणे वाईट आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन वर्गात कामगार विभागला आहे. असंघटित कामगारांच्या हितरक्षणासाठी सरकारने संरक्षण देण्याची गरज आहे. आवश्यक तिथे नवे कायदेही व्हावे.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला हरताळ का फासला जातोय ?सत्तेची मेनका भल्याभल्यांंना आकर्षित करते. विदर्भाचे आंदोलन करणारे नेते राजकारणाला बळी पडले. चळवळ खिळखिळी झाली, हा इतिहास आहे. त्यामुळे विदर्भाच्या मागणीवरून आणि आंदोलनावरून जनतेचा विश्वास उडाला. भाजपाने जाहीरनाम्यात विदर्भ राज्यनिर्मितीचे आश्वासन दिले होते. आता त्याचे उत्तर मागण्यासाठी जोर हवा. कोणतेही आंदोलन लोकशक्तीवर असते. उद्दिष्टासाठी त्यागाची गरज असते.

विदर्भाच्या औद्योगिक सक्षमतेसाठी काय हवे ?विदर्भातील बेकारीचा विचार करून रोजगारप्रधान उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. आधुनिकीकरण आणि तांत्रिक सक्षमतेतून विकास होईल, पण बेकारी दूर होणार नाही. हा विकास मर्यादित असेल. असे विकासाचे धोरण चुकीचे आहे. मिहानकडून विदर्भाला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याची अपेक्षेप्रमाणे प्रगती व्हायला हवी़

टॅग्स :congressकाँग्रेस