शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा

By आनंद डेकाटे | Updated: July 29, 2023 15:39 IST

प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांची नाविण्यपूर्ण संकल्पना

नागपूर : राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला समृद्धी महामार्ग सध्या अपघातांमुळेच जास्त चर्चेत आहेत. येथील वाढत्या अपघातांमुळे लोकांमध्येही भिती पसरली आहे. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी शासनही प्रत्नशील असून विविध उपाययोजना करीत आहे. यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधक प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांनी एक नाविण्यपूर्ण संकल्पना मांडली असून यामुळे समृद्धी महामार्गवरील अपघात कमी होण्यास मदत मिळू शकेल.

समृद्धी महामार्गावरी अपघाताचे मुख्यतः दोन कारणे समोर येत आहे. एक तर वाहन चालकाचे संमोहन व दुसरे वाहनाचे टायर फुटणे. नुकत्याच व्हीएनआयटी विद्यार्थ्यांनी संमोहनचे कारण शोधून काढले. समृध्दी महामार्गाचा सरळ मार्ग, सिमेंटच्या रस्त्यावरुन शुभ्र पांढरा मार्ग वाहन चालकाचे मन विचलीत न करता वाहन चालविण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे, वाहन चालक स्वतःचे नियंत्रण विसरुन संमोहित होतो व वाहनावरचा ताबा विचलीत होतो व अपघात होतात.प्रियल चाैधरी व संजय ढोबळे यांच्या नविन संकल्पनेनुसार वाहन चालकाने आपले वाहन १५० किलोमीटर अंतर चालविल्यानंतर २० किमीने वाहनाची गती कमी करावी. त्यानंतर दर दोन किमीवर २० किमीने वाहनाची गती कमी-कमी करत जावी. याबाबतची माहिती देणारे स्पष्ट व सुंदर फलक रस्त्याच्या बाजुला लावावे. त्यामुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होईल. वाहन चालक संमोहित होणार नाही.

याप्रकारे वाहनाचा वेग ४० किमी पर तास इतका असेल तेव्हा महामार्गावर अर्धा किलोमीटर भागात पाणी साचून ठेवावे. ते वाहन अर्धा किलोमिटर पाण्यातून जाईल व वाहन चालकाला वेगळा अनुभव येईल व तो मुख्यतः संमोहन मुक्त होईल. वाहन चालकाच्या संमोहन मुक्तिसोबत वाहन पाण्यातून गेल्यामुळे वाहनाचे चाके थंडे होतील व चाकातील हवेचा दाब कमी होईल. पुढे १५० किलोमिटर पर्यंत ते टायर फुटण्यापासून वाचेल. यानंतर एका रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाधनगृह, छोटेसे उपहारगृह तयार करावे जेणे करुन वाहन चालकाला तिथे ५-१० मिनिटे थांबवून फ्रेश होता येईल. यानंतर वाहन चालकाने प्रत्येक २ किलोमिटरवर आपल्या वाहनाची गती २० किलोमिटरने वाढवत न्यावी. यामुळे अपघात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा