शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:33 IST

राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयात धडकल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम मिळाला आहे.

ठळक मुद्देआयोगाने घेतला कार्यक्रम मागे : उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयात धडकल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शक्यतेला विराम मिळाला आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वर्षभरापासून प्रलंबित आहे. निवडणुकीतील आरक्षणाविरोधात माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर अद्याप न्यायालयाने निकाल दिलेला नाही. तर प्रकाश डोमके यांची पारशिवनीसंबंधीची सर्वाच्च न्यायालयात दाखल याचिका नुकतीच निकाली निघाल्याने प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला. मात्र बाबा आष्टनकर यांच्या प्रलंबित याचिकेकडे प्रशासनाला विस्मरण झाले. यानंतर निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी अधिसूचना जारी करून निवडणूक प्रक्रिया जारी केली. मात्र बाबा आष्टनकर यांनी हायकोर्टात अवमानना याचिका दाखल करताच निवडणूक आयोगाने तातडीने सोमवारी अधिसूचना जारी करून निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याचे जाहीर केले. आष्टनकर यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर तीन-चारवेळा न्यायालयात सुनावणीसुद्धा झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मागितलेली अनेक कागदपत्रे शासनाजवळ नव्हती. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीदरम्यान शासनाला अनेकदा फटकारलेसुद्धा; शिवाय याचिका न्यायालयात प्रलंबित असून अद्याप निर्णय दिला नाही. मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे बाबा आष्टनकर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि व्यक्त केलेल्या भाकितानुसार प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की आली. काय आहे याचिकेतनिवडणुकीचे आरक्षण ५० टक्क्यावर जाऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, जि.प. निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात २०१६ मध्ये झालेल्या प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांना बगल देण्यात आली. हाच मुद्दा घेऊन माजी जि.प. सदस्य बाबा आष्टनकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय जि.प.ने आखलेल्या प्रभागा(गट)मध्ये जवळची गावे वगळून, दूरची गावे जोडण्यात आली आहते. तसेच तत्कालीन निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी २००७ मध्ये औरंगाबाद न्यायालयात आरक्षणासंदर्भात खोटी कागदपत्रे सादर केली होती. या सर्व प्रकरणांचा समावेश याचिकेत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक