शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नकारात्मक गुणपद्धतीच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात

विनोद तावडे : ‘आयटीआय’च्या मुद्यावर घेणार केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट नागपूर : ‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात केंद्रीय कामगार मंत्र्याशी भेट घेण्यात येईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिले. आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना व शिक्षणसंस्थांना कसलीही अपेक्षित पूर्वसूचना न देता नकारात्मक गुण पद्धत अवलंबिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत रामहरी रुपनवर,शरद रणपिसे आदी सदस्यांनी उपस्थित केली. यावर तावडे यांनी सांगितले की, जानेवारी-फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘आयटीआय’ च्या प्रथम सत्र परीक्षा ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्किंग सिस्टिम) प्रणालीद्वारे घेण्यात आली व त्याचे मूल्यांकन ‘डीजीईटी’ (डायरेक्टोरेट जनरल आॅफ एम्प्लॉयमेन्ट ट्रेनिंग), नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आले. त्यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना १० ‘ग्रेस’ गुण देण्यात आले होते व उत्तीर्णांची टक्केवारी ९१ टक्के इतकी होती.नकारात्मक गुणपद्धती लागू केल्यानंतर सर्वच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. आॅगस्टमध्ये झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेत उत्तीर्णांची टक्केवारी ५१.४७ टक्क्यांवर घसरली. या प्रणालीत बदल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा आहे. सदर बाब ही राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)राज्यात ४१७ ‘आयटीआय’दरम्यान, राज्यात आजच्या तारखेत ४१७ शासकीय ‘आयटीआय’ असून याची प्रवेशक्षमता सुमारे एक लाख इतकी आहे. तर ४१२ अशासकीय ‘आयटीआय’ची प्रवेशक्षमता २८ हजार आहे अशी माहिती तावडे यांनी दिली.