शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या अन् सीमाक्षेत्र वाढले, मात्र कचरा संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:27 IST

Nagpur news नागपूर शहराची लोकसंख्या आणि सीमाक्षेत्र वाढले आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील कचरा संकलन वाढत नसून, उलट विस्मयकारी घट होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे दररोजचे २५० मेट्रिक टन संकलन कमी झाले शहराच्या कचरा संकलन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

राजीव सिंह

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या आणि सीमाक्षेत्र वाढले आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील कचरा संकलन वाढत नसून, उलट विस्मयकारी घट होताना दिसत आहे. घरादारातून आणि बाजारातून होणारे कचरा संकलन दररोज साधारण २३० ते २५० मेट्रिक टनांनी घसरत आहे. या स्थितीने मनपा प्रशासन आनंदात आहे. मात्र, या आनंदाला संशयाचे वळण आहे, हे विशेष. कचरा संकलनासाठी दिला जाणारा मोबदला पूर्वी जास्त होता का किंवा वर्तमानात नियुक्त कंपन्यांकडून कचरा संकलनाबाबत मनमानी केली जात आहे, असे प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत.

२१ मार्चपासून नागपुरात टाळेबंदी लागू झाली. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात रोज ११८०.५२, फेब्रुवारीमध्ये ११४५.५०, मार्चमध्ये १०३६.५० मेट्रिक टन कचरा संकलन झाले. टाळेबंदीच्या काळात हॉटेल, मॉल, मार्केट आदी बंद असल्याने कचरा संकलनात घट झाली, हे मानले जात होते. मात्र, अनलॉक प्रक्रियेनंतरही कचरा संकलनात वाढ झाली नाही. यावरून, या प्रक्रियेत काहीतरी गडबड गोंधळ किंवा कंपन्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षीपर्यंत सरासरी दर महिन्यात ११५० ते १२०० मेट्रिक टन कचरा संकलन होत होता. त्यातच नोव्हेंबरमध्ये मनपाने कचरा संकलन व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी झोन एक ते पाच पर्यंतची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे सोपवली तर झोन सहा ते १०ची जबाबदारी बीवीजी कंपनीला देण्यात आली. परंतु, दोन्ही कंपन्यांच्या नियुक्तीनंतर येत असलेल्या आकडेवारीवरून कचरा संकलनात प्रचंड घसरण नोंदवली जात आहे. दोन स्वतंत्र कंपन्यांच्या हातात शहरातील कचरा संकलन व्यवस्था आल्यानंतर संकलनाचा दर घसरून ११०० ते ११६० मेट्रिक टन दरम्यानच आहे.

टाळेबंदीनंतर संकलनाची स्थिती १००० मेट्रिक टनच्याही खाली आली होती तर अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही संकलनाची स्थिती ९३० ते ९३५ मेट्रिक टनच्या जवळपासच राहिली आहे. मार्च महिन्यात शहरातून ३२१३१.७५ मेट्रिक टन कचरा जमा झाला होता तर सप्टेंबर महिन्यात २८०८६.६१ मेट्रिक टन कचरा संकलन झाले होते.

एक दिवसाआड येत आहेत गाड्या

शहराच्या सीमावर्ती भागात कचरा संकलनासाठी गाड्या रोज येत नाहीत. एक दिवसाआड येत असल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर, मोकळ्या भूखंडावर वगैरे फेकताना दिसतात. पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुतांश वस्त्यांमध्ये कचरागाड्यांच्या अनियमिततेच्या तक्रारी नागरिक नगरसेवकांकडे करत आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष आहे. विजयादशमीनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरादारातील साफसफाईची प्रक्रिया गतिशील होत असते. त्यामुळे, या काळात मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. गाडी येत नसल्याने कचरा रस्त्यावर दिसण्याची शक्यता आहे.

मनपा प्रशासनाचा अंदाज

- सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित होत असल्याने वजन कमी भरत असल्याचा अंदाज मनपाच्या घनकचरा विभागाचा आहे.

- बांधकामासंदर्भातील कचरा, निर्माण सामग्रीसंबंधातील कचरा, माती उचलण्यावर सक्तीचे निर्बंध आहेत.

- संकलन व्यवस्थेवर टेहळणी वाढविण्यात आली आहे आणि अकस्मात भेटीही दिल्या जात आहेत.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न