शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राज्यातील १७ शहरे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:16 IST

महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.

ठळक मुद्देआराखडा होतोय तयार : मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.पर्यावरण मंत्री यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या लेखी उत्तरात ‘हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी महराष्ट्र राज्यातील १७ प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले आहे. सदस्य भीमराव तापकीर, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.नागपूर विद्यापीठात १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं : विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ग्रंथालयात तब्बल १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं असल्याची बाब कॅगच्या अहवालात नमूद असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.सदस्य सुधाकर देशमुख आणि डॉ. मिलिंद माने यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठातील ग्रंथालयात असलेल्या कोट्यवधी पुस्तकांची पडताळणी गेल्या अनेक वर्षांपासून झाली नसल्याची बाब कॅगच्या अहवालात आली असल्याची बाब त्यांनी प्रश्नाद्वारे निदर्शनास आणून दिली. यावर आपल्या लेखी उत्तरात विनोद तावडे यांनी सांगितले की, २०१६-१७ च्या कॅगच्या अहवालामध्ये सन १९९४ पासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी झाली नसल्याचे नमूद केले आहे. तथापि विद्यापीठ परिसरातील ज्ञानस्रोत केंद्रातील ग्रंथ पडताळणी सन २००० मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच यावर्षी शैक्षणिक विभागातील १५ ग्रंथालयांतील ग्रंथ पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. कॅगच्या अहवालात विद्यापीठ ग्रंथालयाच्या स्थितीबाबत काहीही भाष्य करण्यात आले नाही. तथापि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी करणे शक्य झाले नसल्याचे ग्रंथपालांनी कॅगला दिलेल्या उत्तरात नमूद असल्याची बाब कबूल केली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८pollutionप्रदूषण