शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणी टंचाईवरून सत्ताधाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:56 IST

जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागणी शिवसेनेच्या जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी केली आहे. गोडबोलेच्या जाहीर वक्तव्यावरून संतापलेल्या जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी गोडबोले काँग्रेसची सुपारी घेतल्यासारखेच वागत असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी निशा सावरकर व जि.प. सदस्य जयकुमार वर्मा यांनी पत्रपरिषदेतून गोडबोलेंना चांगलीच फटकार लावली.

ठळक मुद्देजि.प. बरखास्त करण्याची शिवसेनेच्या सदस्यांची मागणी : अध्यक्षांनीही केला परखड पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागणी शिवसेनेच्या जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी केली आहे. गोडबोलेच्या जाहीर वक्तव्यावरून संतापलेल्या जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी गोडबोले काँग्रेसची सुपारी घेतल्यासारखेच वागत असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी निशा सावरकर व जि.प. सदस्य जयकुमार वर्मा यांनी पत्रपरिषदेतून गोडबोलेंना चांगलीच फटकार लावली.जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ८१२ बोअरवेल मंजूर केल्या आहेत. परंतु, एकाही बोअरवेलचे काम सुरू झालेले नाही. पदाधिकाऱ्यांकडून निविदेच्या माध्यमातून कामे घेणाऱ्या कंत्राटदाराला कमिशनची मागणी केली जाते, असा अप्रत्यक्ष पण थेट आरोप शिवसेनेच्या जि. प. सदस्य भारती गोडबोले यांनी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्यावर केला. जि.प. मध्ये भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. हा आरोप विरोधकांनी न करता खुद्द सत्तापक्षातील शिवसेनेच्या गोडबोले यांनी करून ‘घरचा अहेर’ दिल्यामुळे हा आरोप जि.प. अध्यक्ष सावरकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गोडबोलेंवर पलटवार करीत निशा सावरकर म्हणाल्या की, भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. पक्षनेतृत्वाच्या सूचनेप्रमाणे आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. मात्र, गोडबोलेंकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्या नेहमीच मला टार्गेट करून स्वत:ला चर्चेत ठेवतात. देवेंद्र व भारती गोडबोले या दाम्पत्याने काँग्रेसची सुपारी घेऊन आमची (भाजप) बदनामी सुरू केली आहे. खरेतर, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सत्तापक्ष व प्रशासन पाणीटंचाई निर्मूलनार्थ झपाट्याने काम करीत आहोत. कंत्राटदाराकडून पैसे मागितले हा गोडबोले यांचा आरोप बिनबुडाचा असून, त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावाच, असे आव्हान सावरकर यांनी दिले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैरभाव विसरून भाजप-शिवसेनेची युती झाली. कार्यकर्त्यांनीही नाही-नाही म्हणता-म्हणता एकमेकांशी जुळवून घेतले. पण मौदा तालुक्यात शिवसेनेच्या गोडबोले व भाजपच्या सावरकर यांच्यामध्ये अजूनही सूत जुळले नाही. या वादाचा फटका उमेदवाराला बसेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरwater scarcityपाणी टंचाई