शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

राजकारणात व्यक्तिपूजा म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल - हमीद अंसारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 18:42 IST

नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर हुकुमशाहीकडे वाटचाल असते

नागपूर : नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा हमखास मार्ग असून ती नंतर हुकुमशाहीकडे वाटचाल असते, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिला असून ही गोष्ट पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी येथे केले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सामाजिक सामाजिक व आर्थिक समता संघाने तयार केलेल्या महाराष्ट्रातील गरीबी, असमानता व भेदभाव, अस्पृष्यता आणि अत्याचारांवरील अहवाल प्रकाशनाचे आणि परिषदेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता संघाचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. र्हदीप कांबळे, डॉ. पी.जी. जोगदंड, डॉ. के.एम. कासारे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  १९४९ घटना परिषदेमध्ये  ऐतिहासिक असे भाषण केले होते या भाषणात त्यांनी भारतीय राज्य घटना, संविधान निर्मिती प्रक्रियेचा सारांश, साध्य करायची स्पष्ट लक्ष्ये, लाभ आणि तृटी सुद्धा भारतीय नागरिक व नगरिकांच्या भविष्यकालीन पिढ्यांना सांगितल्या होत्या.  देशात लोकशाही योग्य रुपात आणि वास्तवात राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना तीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात व्यक्तिच्या व संस्थेच्या स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाऊ नये. व्यक्तीपूजा ही अंध:पतनाकडे नेते. त्यातून हकुमशाही निर्माण होते. दुसरी आपले सामाजिक आणि आर्थिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लवकरात लवकर घटनात्मक पद्धती स्वीकारून घटनाबाह्य पद्धतीचा त्याग करणे, आणि फक्त राजकीय लोकशाहीचा विचार करून चालत नाही. कारण ती सामाजिक लोकशाहीच्या मजबूत पायावरच आधारित असते. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीची व्याख्या करताना स्पष्ट म्हटले आहे की, अशी जीवन पद्धती की जिच्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनतत्तवे, इतकी परावलंबित्व की ज्यात तीन लोकांचा गट ही विभक्त होणार नाही.