शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नासुप्रवरून मनपात ‘राजकारण’ :  सत्ताधारी विरोधकात आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:57 IST

निवडणुकीपूर्वी बरखास्तीबाबत निर्णय जाहीर के ला. परंतु तो नासुप्र कायद्याला धरून नाही. २७ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशातही स्पष्टता नाही. भाजपने शहरातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या विशेष सभेत केला.

ठळक मुद्देनासुप्र बरखास्त झाली नसल्याचा विरोधकांचा दावा : सत्ताधारी म्हणतात शहरात मनपाच नियोजन प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १९३६ साली नासुप्रची स्थापना करण्यात आली. यासाठी स्वतंत्र कायदा होता. त्याआधारे नासुप्रच कारभार सुरू होता. मात्र नासुप्रच्या कामकाजामुळे शहरातील नागरिक त्रस्त होते. नासुप्र बरखास्त व्हावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी होती. नासुप्र बरखास्तीला आमचा पाठिंबाच होता. परंतु सत्ताधारी भाजपने यात राजकारण केले. निवडणुकीपूर्वी बरखास्तीबाबत निर्णय जाहीर के ला. परंतु तो नासुप्र कायद्याला धरून नाही. २७ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशातही स्पष्टता नाही. भाजपने शहरातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या विशेष सभेत केला. तर सत्तापक्षाने पलटवार करीत काँग्रेस नेत्यांनी आजवर नासुप्रचा राजकीय लाभ घेतला. नासुप्रचे भूखंड लाटले, शहराचा सत्यानाश करणाऱ्या नासुप्रची बररखास्तीची प्रक्रिया सुरू असताना पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. यात त्यांचा हेतू चांगला नसल्याचा आरोप केला.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाली. पालकमंत्री नितीन राऊ त यांनी नासुप्रच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या आधारे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून, या प्रकरणाशी संबंधित स्वयंस्पष्टता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली. नासुप्र बरखास्तीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला. परंतु बरखास्तीच्या प्रक्रि येवरून सत्ताधारी व विरोधकात चांगलीच खडाजंगी झाली.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे संदीप सहारे यांनी नासुप्र बरखास्तीबाबत काय प्रक्रिया झाली, अशी विचारणा करून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा संयुक्तिक होणार नसल्याचे निदर्शनास आणले. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनीही हीच भूमिका घेतली. कायदेतज्ज्ञांच्या सल्ला घेतल्यानंतरच सभागृह आयोजित करण्यात आल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.  नगसेवक प्रवीण दटके यांनीही सभागृहात चर्चा करता येत असल्याचे सांगतिले. अ‍ॅड धर्मपाल मेश्राम म्हणाले, शासन निर्णयानुसार नागपूर शहरात महापालिका हे एकच नियोजन प्राधिकरण असावे. यासाठी सात योजना वगळून मनपाला नियोजन प्राधिकरण घोषित करण्यात आले आहे. असे असताना पालकमंत्री नासुप्रला पुन्हा प्राधिकरणाचे अधिकार देऊ पाहात आहेत. यामागे त्यांचा हेतू चांगला नाही. शहरातील नागरिकांना होणारा त्रास विचारात  घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्र बरखास्तीचा निर्णय घेतला. नासुप्रने विकासासाठी जागा आरक्षित केल्या, परंतु त्या विकल्या. आघाडी सरकारने लोकांच्या भावनेचा विचार केला नव्हता. परंतु फडणवीस सरकारने नागरिकांना दिलासा दिला.अशी भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी मांडली. नासुप्रमुळे मागील काही वर्षात शहर विकासात बाधा निर्माण झाली आहे. गुंठेवारी अंतर्गत ले-आऊ ट भागात रस्ते, पाणी,सिवरेज, अशा मूलभूत सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचा आरोप वीरेंद्र कुकरेजा यांनी केला. प्रकाश भोयर म्हणाले नासुप्रचे अधिकारी हुकूमशहा सारखे वागतात. शहराचा विकास न करता नागरिकांना त्यांनी वेठीस धरले.  संजय महाकाळकर यांनी शहरात एकच नियोजन प्राधिकरण असावे, अशी भूमिका मांडली. परंतु  नियमितीकरणासाठी नागरिकांना महापालिकेतही त्रास होत असल्याचे सांगितले. नासुप्रचे भूखंड ज्यांनी हडपले त्यांना जेलमध्ये टाका. स्मशान भूमी, शाळा व बाजारासाठी आरक्षित असलेल्या जागांवर अतिक्रमण होत आहे. या जागा मनपाने ताब्यात घ्यावात, अशी भूमिका पुरुषोत्तम हजारे यांनी मांडली. आभा पांडे म्हणाल्या, शासन निर्णयात स्पष्टता नसल्याने गोंधळ निर्माण झाला. मनपाकडेही गुंठेवारी योजना राबविण्यासाठी मनुष्यबळ नाही. जोपर्यंत कार्यालयासाठी जागा उपलब्ध होत नाही. तोपर्यत फाईल पाठवू नका अशा आशयाचे पत्र नगररचना विभागानेच नासुप्रला दिले आहे. लोकांना आरएल मिळत नाही. बांधकामाच्या मंजुरीसाठी फिरावे लागत असल्याचे सतीश होले म्हणाले. पिंटू झलके यांनी पालकमंत्री यांनी पाठविलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली.  शहरात एकच नियोजन प्राधिकरण असावे,अशी मागणी केली.हरीश ग्वालबंशी यांनी नासुप्र बरखास्तीचा निर्णयच झाला नसल्याचे सांगितले. माजी महापौर नंदा जिचकार यांनी एकच प्राधिकरण असावे, अशी भूमिका मांडली. दर्शनी धवड, जुल्फेकार भुट्टो, जितेंद्र घोडेस्वार, स्वाती आखतकर, हरीश ग्वालबंशी, दिव्या धुरडे, मोहम्मद जमाल, नेहा निकोसे, मनोज सांगोळे, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, अनिल गेंडरे, भूषण शिंगणे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. 

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका