शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

देशात द्वेष, सूड व नकारात्मकतेने भरलेले राजकारण : उर्मिला मातोंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:56 IST

देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे.त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या ७० वर्षाच्या कामावर नाट्य सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे. अशावेळी प्रेम आणि सद्भावना जोपासणारा, सगळ्यांना जोडणारा आपला भारत आपल्यापासून दूर जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले. 

बहुजन विचार मंचच्यावतीने ७० वर्षाच्या कालखंडात काँग्रेस नेत्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आझादी से आझादी की ओर’ या नाटकाचे सादरीकरण गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले. त्यांनी मराठीतून आपले मनोगत मांडले. ७३ वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा देश काहीच नव्हता. त्या देशाला हळूहळू का होईना महासत्ता बनविण्यापर्यंत जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्यात ११ वर्षे तुरुंगात घालविणाºया या महान नेत्यावर आज हीन भाषेत चिखलफेक केली जाते, हे वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जोरात ओरडून बोलणाºयाकडे सर्वांचे लक्ष जाते तसे आज झाले आहे. ओरडून ओरडून खोटे सांगितले जात आहे पण प्रत्येक चमकणारी वस्तू जशी सोने नसते तसे ओरडून सांगितलेली प्रत्येकच गोष्ट सत्य नसते.इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली होती, त्याच नीतीचा वापर करून लोकांमध्ये द्वेष पसरविला जात असल्याची टीका त्यांनी केली. बालभारतीच्या पुस्तकामधील बंधूभावाची प्रतिज्ञा कुठे हरविली हा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे. हा निर्वाणीचा इशारा आहे. काँग्रेस पक्ष नाही, प्रेम आणि सद््भावना जोपासणारी विचारधारा आहे व ती अखंडित आहे, अबाधित राहणार आहे. हा सकारात्मकतेचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री रणजित देशमुख, अनिस अहमद, आमदार प्रकाश गजभिये, प्रफुल गुडधे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, यादवराव देवगडे, एस. क्यू. जामा, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, माजी महापौर कुंदाताई विजयकर, पारस बनोदे, प्रज्ञा बडवाईक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन मोहम्मद सलीम यांनी केले तर नितीन कुंभलकर यांनी आभार मानले.धमन्यात कुठले रक्त आहे, असे विचारण्याचा प्रकार७३ वर्षाच्या काळात काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे आपला देश महासत्ता होण्याच्या मार्गापर्यंत पोहचला आहे. असे असूनही काँग्रेसने ७० वर्षात काय केले, असा प्रश्न विचारला जातो. ७० वर्षात काँग्रेसने काय केले असे विचारणे म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या धमन्यात कुठले रक्त आहे, असे विचारण्यासारखा थट्टाजनक प्रकार असल्याची खरमरीत टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली.काँग्रेस नेत्यांच्या कार्याचा आढावा 
बहुजन विचार मंचतर्फे ‘आझादी से आझादी की ओर’ या नाटकात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य लढ्यापासून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत काँग्रेस नेत्यांच्या ७० वर्षाच्या कामाचा धावता आढावा घेतला आहे. लेखन व दिग्दर्शन सलीम शेख यांचे आहे. कार्यक्रमाचे संयोजन बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार यांनी केले. 
नाटकात पूजा पिंपळकर (भारतमाता), तुषार पौनीकर (राहुल गांधी), प्रशांत मंगदे (महात्मा गांधी), अनिल पालकर (पं. नेहरू), प्रशांत लिखार (सरदार पटेल व नरसिंहराव), रवी पाटील (डॉ. आंबेडकर), इंदिरा गांधी (पूजा मंगळमूर्ती), महेश पातुरकर (लाल बहादूर शास्त्री), प्रशांत खडसे (मनमोहन सिंह), मंजुश्री डोंगरे (सोनिया गांधी), गौतम ढेंगरे (राजीव गांधी) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संगीत चारुदत्त जिचकार यांचे होते. नेपथ्य सचिन गिरी, प्रकाश व्यवस्था मिथून मित्रा व सूत्रधार हेमंत तिडके व अश्विनी पिंपळकर होते.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेस