शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुजाता आनंदन् यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन् लिखित ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.नागपूर प्रेस क्लबला झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना खा.आनंद अडसूळ, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. आशिष देशमुख, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचे असो, विदर्भाला हवा तो न्याय मिळाला नाही. इच्छाशक्तीचीदेखील कमतरता होती. मात्र याचा अर्थ विदर्भाचा विकास न होताच त्याला वेगळे करणे असा होत नाही. जर अविकसित राज्य निर्माण झाले तर पुढील पिढ्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल. विशेष म्हणजे जनतेचे खरोखर याला समर्थन आहे का हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विदर्भावर सातत्याने अन्यायच झाला. या मुद्यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करणारे चर्चेपासून दूर पळतात. विदर्भ राज्य निर्माण झाले तर हा भाग सक्षम होईल, असे श्रीनिवास खांदेवाले म्हणाले. यावेळी लेखिका सुजाता आनंदन् यांनी पुस्तकातील मुद्यांवर भाष्य केले. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. सरिता कौशिक यांनी संचालन केले.विदर्भातील आमदारांनी दिल्लीला विचारावेवेगळ्या विदर्भासंदर्भात प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिले होते. मात्र त्या आश्वासनाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांनी दिल्लीत चलावे व तेथे वरिष्ठ नेत्यांना विचारणा करावी, असे प्रतिपादन आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भJournalistपत्रकार