शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुजाता आनंदन् यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन् लिखित ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.नागपूर प्रेस क्लबला झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना खा.आनंद अडसूळ, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. आशिष देशमुख, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचे असो, विदर्भाला हवा तो न्याय मिळाला नाही. इच्छाशक्तीचीदेखील कमतरता होती. मात्र याचा अर्थ विदर्भाचा विकास न होताच त्याला वेगळे करणे असा होत नाही. जर अविकसित राज्य निर्माण झाले तर पुढील पिढ्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल. विशेष म्हणजे जनतेचे खरोखर याला समर्थन आहे का हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विदर्भावर सातत्याने अन्यायच झाला. या मुद्यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करणारे चर्चेपासून दूर पळतात. विदर्भ राज्य निर्माण झाले तर हा भाग सक्षम होईल, असे श्रीनिवास खांदेवाले म्हणाले. यावेळी लेखिका सुजाता आनंदन् यांनी पुस्तकातील मुद्यांवर भाष्य केले. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. सरिता कौशिक यांनी संचालन केले.विदर्भातील आमदारांनी दिल्लीला विचारावेवेगळ्या विदर्भासंदर्भात प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिले होते. मात्र त्या आश्वासनाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांनी दिल्लीत चलावे व तेथे वरिष्ठ नेत्यांना विचारणा करावी, असे प्रतिपादन आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भJournalistपत्रकार