शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुजाता आनंदन् यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन् लिखित ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.नागपूर प्रेस क्लबला झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना खा.आनंद अडसूळ, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. आशिष देशमुख, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचे असो, विदर्भाला हवा तो न्याय मिळाला नाही. इच्छाशक्तीचीदेखील कमतरता होती. मात्र याचा अर्थ विदर्भाचा विकास न होताच त्याला वेगळे करणे असा होत नाही. जर अविकसित राज्य निर्माण झाले तर पुढील पिढ्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल. विशेष म्हणजे जनतेचे खरोखर याला समर्थन आहे का हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विदर्भावर सातत्याने अन्यायच झाला. या मुद्यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करणारे चर्चेपासून दूर पळतात. विदर्भ राज्य निर्माण झाले तर हा भाग सक्षम होईल, असे श्रीनिवास खांदेवाले म्हणाले. यावेळी लेखिका सुजाता आनंदन् यांनी पुस्तकातील मुद्यांवर भाष्य केले. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. सरिता कौशिक यांनी संचालन केले.विदर्भातील आमदारांनी दिल्लीला विचारावेवेगळ्या विदर्भासंदर्भात प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिले होते. मात्र त्या आश्वासनाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांनी दिल्लीत चलावे व तेथे वरिष्ठ नेत्यांना विचारणा करावी, असे प्रतिपादन आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भJournalistपत्रकार