शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

भाजपमध्ये कोण करतंय ठाकरेंना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 11:37 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे‘सोशल’ माध्यमावर खदखद, चर्चांना ऊत भाजप नेत्यांमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचेच संकेत

नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे. मनपाच्या सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी बहुजनांवर अन्याय करण्यात येत असून, कटकारस्थान करून आमच्यासारख्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे, असा आरोपच ‘सोशल’ माध्यमांतून केला आहे. त्यांचा रोख भाजपमधीलच पदाधिकाऱ्यांकडे असल्याची चर्चा पक्षाच्या गोटात असून, नेमके कुठले नेते त्यांना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश भंडारी यांची श्यामनगर हनुमान सेवा समिती आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ठाकरे नगरसेवक असलेल्या प्रभाग ३५ मधील श्यामनगर परिसरात विविध शासकीय योजनांसाठी शिबिर घेण्यात आले. यात ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. यामुळेच ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोख जोशी व भंडारी यांच्यावरच असल्याची चर्चा आहे.

ठाकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता मी पक्षावर नाराज नाही. ही पोस्ट मी खाजगी पातळीवर टाकली आहे. माझी नाराजी मला ज्यांना कळवायची होती, त्यांना ती या पोस्टमुळे समजली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. रमेश भंडारी व संदीप जोशी यांच्याशी संपर्क झाला नाही. या एकूणच प्रकारामुळे पक्षात ‘ऑल इज वेल’ नसल्याचेच चित्र समोर आले असून, आगामी निवडणुकांत पक्षाअंतर्गत चढाओढीचे आव्हान वाढण्याची चिन्हे आहेत.

कुठल्याही ओबीसीवर अन्याय नाही : दटके

पक्षात सर्व काही ठीक असून जातीभेदाला स्थान नाही. मी ओबीसी असून पक्षात आमच्यावर कोणताही अन्याय नाही. कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करावी, असे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.

ही आहे ठाकरेंची पोस्ट

महात्मा फुलेंचा संघर्ष हा कोणत्या व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध नव्हता तर प्रवृत्तीविरुद्ध होता. आजही समाजामध्ये अशा प्रवृत्ती आहेत ज्यांना आमच्यासारख्या सर्वसामान्य बहुजनांनी मेहनतीने कमावलेले यश पचवता येत नाही. म्हणुनच मग कट कारस्थान करून आमच्या सारख्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गुलामी स्वीकारली नाही म्हणुन स्वाभिमानाला ठेच पोहचवून प्रताडीत करण्याच षडयंत्र रचल्या जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBJPभाजपा