शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये कोण करतंय ठाकरेंना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 11:37 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे‘सोशल’ माध्यमावर खदखद, चर्चांना ऊत भाजप नेत्यांमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचेच संकेत

नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे. मनपाच्या सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी बहुजनांवर अन्याय करण्यात येत असून, कटकारस्थान करून आमच्यासारख्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे, असा आरोपच ‘सोशल’ माध्यमांतून केला आहे. त्यांचा रोख भाजपमधीलच पदाधिकाऱ्यांकडे असल्याची चर्चा पक्षाच्या गोटात असून, नेमके कुठले नेते त्यांना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश भंडारी यांची श्यामनगर हनुमान सेवा समिती आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ठाकरे नगरसेवक असलेल्या प्रभाग ३५ मधील श्यामनगर परिसरात विविध शासकीय योजनांसाठी शिबिर घेण्यात आले. यात ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. यामुळेच ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोख जोशी व भंडारी यांच्यावरच असल्याची चर्चा आहे.

ठाकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता मी पक्षावर नाराज नाही. ही पोस्ट मी खाजगी पातळीवर टाकली आहे. माझी नाराजी मला ज्यांना कळवायची होती, त्यांना ती या पोस्टमुळे समजली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. रमेश भंडारी व संदीप जोशी यांच्याशी संपर्क झाला नाही. या एकूणच प्रकारामुळे पक्षात ‘ऑल इज वेल’ नसल्याचेच चित्र समोर आले असून, आगामी निवडणुकांत पक्षाअंतर्गत चढाओढीचे आव्हान वाढण्याची चिन्हे आहेत.

कुठल्याही ओबीसीवर अन्याय नाही : दटके

पक्षात सर्व काही ठीक असून जातीभेदाला स्थान नाही. मी ओबीसी असून पक्षात आमच्यावर कोणताही अन्याय नाही. कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करावी, असे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.

ही आहे ठाकरेंची पोस्ट

महात्मा फुलेंचा संघर्ष हा कोणत्या व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध नव्हता तर प्रवृत्तीविरुद्ध होता. आजही समाजामध्ये अशा प्रवृत्ती आहेत ज्यांना आमच्यासारख्या सर्वसामान्य बहुजनांनी मेहनतीने कमावलेले यश पचवता येत नाही. म्हणुनच मग कट कारस्थान करून आमच्या सारख्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गुलामी स्वीकारली नाही म्हणुन स्वाभिमानाला ठेच पोहचवून प्रताडीत करण्याच षडयंत्र रचल्या जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBJPभाजपा