शहरं
Join us  
Trending Stories
1
'हायवेच्या प्रत्येक किमीत पैसा खात आहेत, टोलमधून मिळालेला पैसा थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला'; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
5
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
6
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
7
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
9
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
10
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
11
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
12
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
13
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
14
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
15
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
16
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
17
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
18
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
19
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
20
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...

हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:52 IST

मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देमहिला धम्म मेळाव्यात नवीन शिक्षण धोरणावर चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कोणत्याही काळात महत्त्वाचे असते कारण शिक्षणामुळेच माणसात निर्भयता व स्वतंत्रवृत्ती निर्माण होते. मात्र शासनाने आणलेले नवीन शिक्षण धोरण हे विपरीत आहे. मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि महिला संघटनेच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित महिला धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी वक्ता म्हणून वंदना वनकर तसेच डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुषमा भड, छाया खोब्रागडे, वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी मूल्य ही तथागत बुद्धाच्या केंद्रस्थानी होते. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाला अनुरूप मानवी मूल्य रुजविणे गरजेचे आहे. मात्र नवे शिक्षण धोरण धार्मिक मूल्य रुजविणारे आहे, ज्यात धर्मनिरपेक्षतेला पायदळी तुडविले जात आहे. हिंदू धर्म व संस्कृतीला अनुकूल करून धर्माची मानसिक गुलामी विद्यार्थीदशेपासून लादली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.वंदना वनकर यांनी नव्या शिक्षण धोरणातील अनेक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. हे धोरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त व गरिबांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी शाळा बंद करून शिक्षणात खासगीकरणाला चालना देण्यात येत आहे. पारंपरिक सण, संस्कृतीचा आदर्श जोपासण्याच्या नावावर वर्णव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जात आहे. पुरातन काळातील गुरुकुल पद्धती आदर्श असण्याचा उल्लेख करून शिक्षणातून जातीभेदाचा पुरस्कार करण्यात येत आहे. पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेला बळकट करून स्त्रियांची गुलामगिरी अधिक घट्ट करण्यात येत असल्याचा आरोप करीत हे धोरण म्हणजे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा व गुलामगिरीचा जाहीरनामाच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.छाया खोब्रागडे यांनी धोरणातील भाषिक तरतुदींवर विचार मांडले तर डॉ. सरोज आगलावे यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाच्या प्रयत्नाकडे लक्ष वेधले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन शामला वाघधरे यांनी तर संघमित्रा नगरकर यांनी आभार मानले. सविता कांबळे, सुजाता लोखंडे, मायाताई थोरात आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला