शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:52 IST

मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देमहिला धम्म मेळाव्यात नवीन शिक्षण धोरणावर चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कोणत्याही काळात महत्त्वाचे असते कारण शिक्षणामुळेच माणसात निर्भयता व स्वतंत्रवृत्ती निर्माण होते. मात्र शासनाने आणलेले नवीन शिक्षण धोरण हे विपरीत आहे. मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि महिला संघटनेच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित महिला धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी वक्ता म्हणून वंदना वनकर तसेच डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुषमा भड, छाया खोब्रागडे, वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी मूल्य ही तथागत बुद्धाच्या केंद्रस्थानी होते. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाला अनुरूप मानवी मूल्य रुजविणे गरजेचे आहे. मात्र नवे शिक्षण धोरण धार्मिक मूल्य रुजविणारे आहे, ज्यात धर्मनिरपेक्षतेला पायदळी तुडविले जात आहे. हिंदू धर्म व संस्कृतीला अनुकूल करून धर्माची मानसिक गुलामी विद्यार्थीदशेपासून लादली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.वंदना वनकर यांनी नव्या शिक्षण धोरणातील अनेक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. हे धोरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त व गरिबांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी शाळा बंद करून शिक्षणात खासगीकरणाला चालना देण्यात येत आहे. पारंपरिक सण, संस्कृतीचा आदर्श जोपासण्याच्या नावावर वर्णव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जात आहे. पुरातन काळातील गुरुकुल पद्धती आदर्श असण्याचा उल्लेख करून शिक्षणातून जातीभेदाचा पुरस्कार करण्यात येत आहे. पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेला बळकट करून स्त्रियांची गुलामगिरी अधिक घट्ट करण्यात येत असल्याचा आरोप करीत हे धोरण म्हणजे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा व गुलामगिरीचा जाहीरनामाच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.छाया खोब्रागडे यांनी धोरणातील भाषिक तरतुदींवर विचार मांडले तर डॉ. सरोज आगलावे यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाच्या प्रयत्नाकडे लक्ष वेधले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन शामला वाघधरे यांनी तर संघमित्रा नगरकर यांनी आभार मानले. सविता कांबळे, सुजाता लोखंडे, मायाताई थोरात आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला