शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांकरिता धोरण आखण्यात येणार, संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सभागृहात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 21:30 IST

राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाने सुरु केलेला आहे.

नागपूर : “राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाने सुरु केलेला आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. बांधकामाच्या ठिकाणी अपघात घडल्यास त्या बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येईल,” अशी माहिती आज राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

शिवसेना उपनेत्या व विधान परिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या बांधकाम मजुरांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी सूचना मांडली होती. आ. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पुण्यातील सिंहगड रोडवर  पु. ल. देशपांडे परिसरात मनपा आरोग्य कोठी समोर बांधकाम सुरु असलेल्या ‘सेया’ इमारतीमध्ये दहाव्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरु असताना त्याचा  काही भाग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घडली होती. तेथे सेंट्रींग काम करत असलेले कामगार जखमी झाले, तर प्रकाश साव (वय २६), दुलारी पासवान (वय २८), मिथुन सिंग (वय २२) या तीन  कामगारांचा मृत्यू झाला होता.  सर्व मजूर हे  झारखंड येथील रहिवाशी असून कामानिमित्त पुणे येथे राहत होते. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले सुरक्षेचे उपाय न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे आ. डॉ. गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले होते.

पुण्यात दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत ३२८ / २०१७ अन्वये गुन्हा दाखला करण्यात आला होता. या इमारतीचे काम करीत असलेल्या संबंधित विकासकावर मात्र कोणतीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही. या घटनेत ठेकेदारासोबतच या इमारतीचे विकासकांनाही सहआरोपी करण्यात यावे. या मजुरांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात पैसे दिले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यात आलेली नव्हती. तसेच या मजुरांचा विमा होता की नाही याची कोणतीही कागदपत्रे व ठेकेदार बरोबरच्या भागीदाराचा कराराचे स्वरूप याबाबत माहिती उपलब्ध नाही.  या ठिकाणी आ. डॉ. गोऱ्हे यांनी १९ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती देखील घेतली होती.

अशीच आणखी एक घटना दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी पिंपरी चिंचवड परिसरातही पिंपळे सौदागर येथेही “झुलेलाल टॉवर या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात झाली होती. तिथे एका मजूर महिलेच्या डोक्यात सातव्या मजल्यावरून वासा पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करीत बिल्डरच्या दबावामुळे पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला नव्हता. तिच्या नातेवाईकांना देखील याची माहिती मिळू दिली नव्हती. याबाबत अनेक वर्तमानपत्रात बातम्या आल्या मात्र कारवाई काहीही झाली नाही.

अशा पद्धतीने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये अनेकदा स्थानिक व्यावसायिक पोलिसांच्या मदतीने प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम व्यावसायिक व त्यांचे ठेकेदार यांच्यामध्ये कामगार व कामाबाबत होणारा करार सर्वांच्या माहितीकरिता ऑनलाइन उपलब्ध असला पाहिजे. जेणेकरून त्यांच्यात झालेल्या अटींची माहिती सर्वाना राहील. बांधकामाच्या ठिकाणच्या प्रत्येक घटनेची जबाबदारी त्या ठेकेदारावरही तितकीच आहे. बांधकामाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कामगारांची अधिकृतरीत्या नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. किमान वेतन निरीक्षकांच्या पदांची गरज असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून घेण्यात येणाऱ्या सेसच्या माध्यमातून मोठी रक्कम राज्य शासनाकडे जमा झालेली आहे. तिचा वापर बांधकाम कामगारांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी व्हावा. शासनाकडून काही प्रकरणात ‘काम थांबवा’ आदेश दिल्यानंतरदेखील काही व्यावसायिक ते वेगळ्या पद्धतीने सुरु करून घेतात.’

त्यावर उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, सरकार कामगारांची नोंद करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवीत आहे. जवळपास ६ लाख कामगारांची नोंद या माध्यमातून झालेली आहे. दुसऱ्यांसाठी घर निर्माण करणाऱ्या या वर्गासाठी घरे, भोजनाकरिता मध्यवर्ती स्वयंपाक गृह असे विविध प्रकारचे लाभ देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासन गांभीर्याने विचार करीत आहे. मार्च २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. ’

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७