शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पोलिसांमागे धावत होते पोलीस ! कायदा तोडणाऱ्या ५५ पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:52 IST

कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई करण्यात आली .

ठळक मुद्देनागपूर शहर  वाहतूक शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. होय, सोमवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी कायदा तोडणाऱ्या थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई केली. या कारवाईत केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे तर काही अधिकारीही अडकले.वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कुणाचीही गैरसोय होऊ नये आणि अपघात घडू नये म्हणून वाहतुकीचे नियम, कायदे बनविण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीस चालान कारवाई करतात. पोलीस नागरिकांवर कारवाई करतात मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कधीच कारवाई करीत नाही, अशी सर्वसामान्य वाहनचालकांची ओरड असते. वाहतूक पोलिसांवर पक्षपाताचाही आरोप होतो. अनेकदा तक्रारीही होतात. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी हा आरोप टाळण्यासाठी ‘कायदा सर्वांसाठी समान’ याची प्रचिती देणारी मोहीम सोमवारी शहरात राबविली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा सर्वसामान्य माणूस असो, पोलीस कर्मचारी असो की अधिकारी अशा सर्वांवरच कारवाईचा धडाका लावण्यात आला. त्यात चक्क ५५ पोलीस अडकले. या सर्वांवर चालान कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. कारवाईत अडकलेल्यांमध्ये गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या वाहन चालकांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही विशेष मोहीम राबविली.कारवाईचे स्वरूपविना हेल्मेट : ४३सीटबेल्ट न लावणारे : १२विविध वाहनांचे एकूण दोषी चालक : ५५आपली जबाबदारी जास्त : डॉ. उपाध्यायकायदा मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आम्हा पोलिसांना आहे. त्यामुळे कायद्याचे सक्तीने पालन करण्याची जबाबदारी आमची सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचे कसोशीने पालन केलेच पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस