शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

पोलिसांमागे धावत होते पोलीस ! कायदा तोडणाऱ्या ५५ पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:52 IST

कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई करण्यात आली .

ठळक मुद्देनागपूर शहर  वाहतूक शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. होय, सोमवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी कायदा तोडणाऱ्या थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई केली. या कारवाईत केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे तर काही अधिकारीही अडकले.वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कुणाचीही गैरसोय होऊ नये आणि अपघात घडू नये म्हणून वाहतुकीचे नियम, कायदे बनविण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीस चालान कारवाई करतात. पोलीस नागरिकांवर कारवाई करतात मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कधीच कारवाई करीत नाही, अशी सर्वसामान्य वाहनचालकांची ओरड असते. वाहतूक पोलिसांवर पक्षपाताचाही आरोप होतो. अनेकदा तक्रारीही होतात. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी हा आरोप टाळण्यासाठी ‘कायदा सर्वांसाठी समान’ याची प्रचिती देणारी मोहीम सोमवारी शहरात राबविली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा सर्वसामान्य माणूस असो, पोलीस कर्मचारी असो की अधिकारी अशा सर्वांवरच कारवाईचा धडाका लावण्यात आला. त्यात चक्क ५५ पोलीस अडकले. या सर्वांवर चालान कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. कारवाईत अडकलेल्यांमध्ये गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या वाहन चालकांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही विशेष मोहीम राबविली.कारवाईचे स्वरूपविना हेल्मेट : ४३सीटबेल्ट न लावणारे : १२विविध वाहनांचे एकूण दोषी चालक : ५५आपली जबाबदारी जास्त : डॉ. उपाध्यायकायदा मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आम्हा पोलिसांना आहे. त्यामुळे कायद्याचे सक्तीने पालन करण्याची जबाबदारी आमची सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचे कसोशीने पालन केलेच पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस