शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:33 IST

पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला.

ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारी घटविण्यात यश : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला. गुरुवारी त्यांनी या संबंधाने पत्रकारांशी जिमखान्यात संवाद साधला. कुख्यात गुंडांवर कठोर कारवाई करण्यात कसलीही हयगय करण्यात येणार नाही, असे सांगतानाच काही ठिकाणी पोलीस अपयशी ठरले, याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.पोलीस आयुक्तांचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन शहरात घडलेल्या २०१७ आणि २०१८ मधील गुन्हेगारीचा तुलनात्मक अहवाल पोलिसांसमोर ठेवला. ते म्हणाले, पोलिसांनी ऑपरेशन क्रिस्प, ऑपरेशन क्रॅकडाऊन आणि ऑपरेशन वाईप आऊट राबविले. त्यात १६, ३७७ गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे संकलित झाली. यात काही नवीन तर काही जुन्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्वांच्या हालचालीवर आम्ही नजर ठेवून आहोत. सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाचे १३ गुन्हे कमी झाले, बलात्काराचे ८, विनयभंगाचे १०, चेनस्रॅचिंग ४१, लुटमार ८०, खंडणी वसुलीचे ६, घरफोडीचे १३४, दुखापतीचे ३५ आणि इतर असे एकूण ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असल्यामुळे शहरातील ९ टक्के गुन्हे कमी झाले. गेल्या वर्षी ८५८४ गुन्हे घडले. त्यातील ५४३७ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यातही पोलिसांनी यश मिळवल्याचे ते म्हणाले. तडीपार गुंड शहरातच फिरतात आणि गुन्हेही करतात. वर्षाच्या अखेरच्या दिवशी इमामवाड्यातील तडीपार गुंडांना एका निरपराध तरुणाला घरातून खेचून बाहेर काढले आणि त्याची हत्या केली, हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी हा प्रकार खेदजनक असल्याचे सांगून पोलिसांचे ते अपयश असल्याचे कबूल केले.पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, राहुल माकणीकर, संभाजी कदम, चिन्मय पंडित, हर्ष पोद्दार, विवेक मासाळ, राजतिलक रोशन, निर्मला देवी, श्वेता खेडकर उपस्थित होते.दामिनी पथक आणि वादग्रस्त पोलीसमहिला-मुलीच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच सडकछाप मजनूंना आवरण्यासाठी पोलिसांनी दामिनी पथकांची निर्मिती केली. ही पथके जबाबदारीची औपचारिकता पूर्ण करताना दिसतात. त्यामुळे महिला-मुलीच्या विनयभंगाचे प्रकार भररस्त्यावर घडत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी दामिनी पथके अधिक कार्यशिल करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचाही मुद्दा उपस्थित झाला. अशा पोलीस अधिकाऱ्याबाबत ठोस तक्रार आणि पुरावे मिळाल्यास कडक कारवाई करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.तडीपारांवरील कारवाईबाबत वेगळा विचारवर्षभरात अनेक गुंडांना तडीपार करण्यात आले तर गुंडांच्या आठ टोळ्यांवर मोक्का लावून अनेक कुख्यात गुंडांना स्थानबद्ध करण्यात आले. मात्र एवढे करूनही तडीपार गुंड शहरात मोकाट फिरताना, गुन्हे करताना दिसतात. त्यामुळे तडीपार गुंडांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यावर आम्ही विचार करीत आहोत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.पावणे तीन कोटींचे अमली पदार्थ जप्तगुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच तस्करी करणारांवर कारवाई करीत वर्षभरात २ कोटी ८२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. वेगवेगळ्या मार्गाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करून अनेक हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले.वाहतूक समस्याउपराजधानीत सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सुरळीत राखणे कठीण झाले आहे. अशाही अवस्थेत पोलीस चांगल्या पद्धतीने वाहतूकीची कोंडी टाळून अपघात घडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचमुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट सक्ती आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमांमुळे अपघात कमी होण्यात मदत झाली आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय