शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:33 IST

पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला.

ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारी घटविण्यात यश : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला. गुरुवारी त्यांनी या संबंधाने पत्रकारांशी जिमखान्यात संवाद साधला. कुख्यात गुंडांवर कठोर कारवाई करण्यात कसलीही हयगय करण्यात येणार नाही, असे सांगतानाच काही ठिकाणी पोलीस अपयशी ठरले, याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.पोलीस आयुक्तांचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन शहरात घडलेल्या २०१७ आणि २०१८ मधील गुन्हेगारीचा तुलनात्मक अहवाल पोलिसांसमोर ठेवला. ते म्हणाले, पोलिसांनी ऑपरेशन क्रिस्प, ऑपरेशन क्रॅकडाऊन आणि ऑपरेशन वाईप आऊट राबविले. त्यात १६, ३७७ गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे संकलित झाली. यात काही नवीन तर काही जुन्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्वांच्या हालचालीवर आम्ही नजर ठेवून आहोत. सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाचे १३ गुन्हे कमी झाले, बलात्काराचे ८, विनयभंगाचे १०, चेनस्रॅचिंग ४१, लुटमार ८०, खंडणी वसुलीचे ६, घरफोडीचे १३४, दुखापतीचे ३५ आणि इतर असे एकूण ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असल्यामुळे शहरातील ९ टक्के गुन्हे कमी झाले. गेल्या वर्षी ८५८४ गुन्हे घडले. त्यातील ५४३७ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यातही पोलिसांनी यश मिळवल्याचे ते म्हणाले. तडीपार गुंड शहरातच फिरतात आणि गुन्हेही करतात. वर्षाच्या अखेरच्या दिवशी इमामवाड्यातील तडीपार गुंडांना एका निरपराध तरुणाला घरातून खेचून बाहेर काढले आणि त्याची हत्या केली, हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी हा प्रकार खेदजनक असल्याचे सांगून पोलिसांचे ते अपयश असल्याचे कबूल केले.पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, राहुल माकणीकर, संभाजी कदम, चिन्मय पंडित, हर्ष पोद्दार, विवेक मासाळ, राजतिलक रोशन, निर्मला देवी, श्वेता खेडकर उपस्थित होते.दामिनी पथक आणि वादग्रस्त पोलीसमहिला-मुलीच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच सडकछाप मजनूंना आवरण्यासाठी पोलिसांनी दामिनी पथकांची निर्मिती केली. ही पथके जबाबदारीची औपचारिकता पूर्ण करताना दिसतात. त्यामुळे महिला-मुलीच्या विनयभंगाचे प्रकार भररस्त्यावर घडत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी दामिनी पथके अधिक कार्यशिल करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचाही मुद्दा उपस्थित झाला. अशा पोलीस अधिकाऱ्याबाबत ठोस तक्रार आणि पुरावे मिळाल्यास कडक कारवाई करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.तडीपारांवरील कारवाईबाबत वेगळा विचारवर्षभरात अनेक गुंडांना तडीपार करण्यात आले तर गुंडांच्या आठ टोळ्यांवर मोक्का लावून अनेक कुख्यात गुंडांना स्थानबद्ध करण्यात आले. मात्र एवढे करूनही तडीपार गुंड शहरात मोकाट फिरताना, गुन्हे करताना दिसतात. त्यामुळे तडीपार गुंडांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यावर आम्ही विचार करीत आहोत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.पावणे तीन कोटींचे अमली पदार्थ जप्तगुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच तस्करी करणारांवर कारवाई करीत वर्षभरात २ कोटी ८२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. वेगवेगळ्या मार्गाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करून अनेक हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले.वाहतूक समस्याउपराजधानीत सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सुरळीत राखणे कठीण झाले आहे. अशाही अवस्थेत पोलीस चांगल्या पद्धतीने वाहतूकीची कोंडी टाळून अपघात घडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचमुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट सक्ती आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमांमुळे अपघात कमी होण्यात मदत झाली आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय