शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

नागपुरातील  कथित गोळीबाराने पोलिसांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:33 IST

जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ठळक मुद्देवचपा काढण्यासाठी क्लृप्ती : तक्रार करणाराच निघाला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.इंडिगो कारमधून आलेल्या चार ते पाच गुंडांनी उप्पलवाडीत येऊन पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती फिरोज खान नामक तरुणाने जरीपटका पोलिसांना कळविली. त्यापूर्वी त्याने ही माहिती नियंत्रण कक्षातही दिली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस जिमखान्यात वार्षिक गुन्ह्यांचा आढावा घेत होते. हे वृत्त कळताच परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार आणि जरीपटका तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा उप्पलवाडीत पोहचला. त्यांनी फोन करणाऱ्या फिरोज खानला शोधून काढले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहचले. आरोपींनी चार गोळ्या झाडल्याचे फिरोज सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे रिकाम्या पुंगळ्या शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, काडतुसाची एकही पुंगळी पोलिसांना आढळली नाही. त्यामुुळे आजूबाजूच्या मंडळींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणीच असे काही घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिरोजने सांगितलेल्या विलास नामक तरुणाला आणि साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेच्या वेळी आपण दुसऱ्याच भागात कामावर होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीतून गोळीबाराची शहानिशा केली. मात्र, त्यातही काहीच आढळले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनी फिरोजलाच त्यांच्या पद्धतीने बोलते केले. सुरुवातीला विसंगत माहिती देणारा फिरोज अखेर खरे बोलला. असे काही झालेच नाही. ज्यांनी गोळीबार केला, असे सांगितले त्या तरुणांसोबत आपले पटत नाही. ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण गोळीबाराची खोटी तक्रारवजा माहिती पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.दरम्यान, गोळीबार घडलाच नाही. कांगावा करणाऱ्या फिरोजने त्याच्याशी रात्री दारूच्या नशेत विलास आणि सोनूसोबत वाद झाला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी हा उपद्रव करून पोलीस यंत्रणेची तारांबळ उडवून दिल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार