शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरातील  कथित गोळीबाराने पोलिसांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:33 IST

जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ठळक मुद्देवचपा काढण्यासाठी क्लृप्ती : तक्रार करणाराच निघाला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.इंडिगो कारमधून आलेल्या चार ते पाच गुंडांनी उप्पलवाडीत येऊन पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती फिरोज खान नामक तरुणाने जरीपटका पोलिसांना कळविली. त्यापूर्वी त्याने ही माहिती नियंत्रण कक्षातही दिली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस जिमखान्यात वार्षिक गुन्ह्यांचा आढावा घेत होते. हे वृत्त कळताच परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार आणि जरीपटका तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा उप्पलवाडीत पोहचला. त्यांनी फोन करणाऱ्या फिरोज खानला शोधून काढले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहचले. आरोपींनी चार गोळ्या झाडल्याचे फिरोज सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे रिकाम्या पुंगळ्या शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, काडतुसाची एकही पुंगळी पोलिसांना आढळली नाही. त्यामुुळे आजूबाजूच्या मंडळींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणीच असे काही घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिरोजने सांगितलेल्या विलास नामक तरुणाला आणि साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेच्या वेळी आपण दुसऱ्याच भागात कामावर होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीतून गोळीबाराची शहानिशा केली. मात्र, त्यातही काहीच आढळले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनी फिरोजलाच त्यांच्या पद्धतीने बोलते केले. सुरुवातीला विसंगत माहिती देणारा फिरोज अखेर खरे बोलला. असे काही झालेच नाही. ज्यांनी गोळीबार केला, असे सांगितले त्या तरुणांसोबत आपले पटत नाही. ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण गोळीबाराची खोटी तक्रारवजा माहिती पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.दरम्यान, गोळीबार घडलाच नाही. कांगावा करणाऱ्या फिरोजने त्याच्याशी रात्री दारूच्या नशेत विलास आणि सोनूसोबत वाद झाला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी हा उपद्रव करून पोलीस यंत्रणेची तारांबळ उडवून दिल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार