शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

नागपुरातील  कथित गोळीबाराने पोलिसांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:33 IST

जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ठळक मुद्देवचपा काढण्यासाठी क्लृप्ती : तक्रार करणाराच निघाला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.इंडिगो कारमधून आलेल्या चार ते पाच गुंडांनी उप्पलवाडीत येऊन पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती फिरोज खान नामक तरुणाने जरीपटका पोलिसांना कळविली. त्यापूर्वी त्याने ही माहिती नियंत्रण कक्षातही दिली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस जिमखान्यात वार्षिक गुन्ह्यांचा आढावा घेत होते. हे वृत्त कळताच परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार आणि जरीपटका तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा उप्पलवाडीत पोहचला. त्यांनी फोन करणाऱ्या फिरोज खानला शोधून काढले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहचले. आरोपींनी चार गोळ्या झाडल्याचे फिरोज सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे रिकाम्या पुंगळ्या शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, काडतुसाची एकही पुंगळी पोलिसांना आढळली नाही. त्यामुुळे आजूबाजूच्या मंडळींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणीच असे काही घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिरोजने सांगितलेल्या विलास नामक तरुणाला आणि साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेच्या वेळी आपण दुसऱ्याच भागात कामावर होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीतून गोळीबाराची शहानिशा केली. मात्र, त्यातही काहीच आढळले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनी फिरोजलाच त्यांच्या पद्धतीने बोलते केले. सुरुवातीला विसंगत माहिती देणारा फिरोज अखेर खरे बोलला. असे काही झालेच नाही. ज्यांनी गोळीबार केला, असे सांगितले त्या तरुणांसोबत आपले पटत नाही. ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण गोळीबाराची खोटी तक्रारवजा माहिती पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.दरम्यान, गोळीबार घडलाच नाही. कांगावा करणाऱ्या फिरोजने त्याच्याशी रात्री दारूच्या नशेत विलास आणि सोनूसोबत वाद झाला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी हा उपद्रव करून पोलीस यंत्रणेची तारांबळ उडवून दिल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार