शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सासरच्यांना धडा शिकविण्याकरिता पोलिस तक्रार रामबाण उपाय झाला : हायकोर्टाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:24 IST

कौटुंबिक वादानंतर सासरच्या मंडळींना धडा : विवाहितांच्या प्रवृत्तीवर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक वादानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकविण्यासाठी पोलिस तक्रारीचा रामबाण उपाय म्हणून वापर केला जात आहे. आजकाल विवाहितांमध्ये ही प्रवृत्ती फार वाढल्याचे निदर्शनास आले आहे, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

बरेचदा पतीच्या नातेवाइकांवर वाईट हेतूने गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात. त्यामुळे त्यांना निरपराध असतानाही फौजदारी कारवाईच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यांना जाणीवपूर्वक कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये गोवले जाते, असेदेखील न्यायालय म्हणाले. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला. विवाहिता सीमा आवारे यांच्या तक्रारीवरून वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव येथील पती संदीप, सासरा देवीदास, सासू कमलाबाई व इतर पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ व इतर संबंधित गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला होता. तसेच, न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाला पती वगळता इतर सर्व आरोपींवर अपमानास्पद वागणूक देणे, पतीला चिथावणी देणे असे सामान्य स्वरूपाचे आरोप केले गेले असल्याचे आणि तक्रारीमध्ये वेळ, तारीख, ठिकाण, छळाचे स्वरूप इत्यादीबाबत विस्तृत माहिती दिली गेली नसल्याचे आढळून आले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित परखड मत व्यक्त करून पती वगळता इतर सर्व आरोपींविरुद्धचा एफआयआर व खटला रद्द केला.

पतीवरील खटला कायमसीमा यांचे सर्व मुख्य आरोप पती संदीपविरुद्ध असल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने संदीपविरुद्धचा एफआयआर व खटला कायम ठेवला. या दाम्पत्याचे २ जून २०१४ रोजी लग्न झाले आहे. वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने घटस्फोटासाठीही याचिका दाखल केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय