शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलिसांचा दावा फोल; आॅटोचालकांची मनमानी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:14 IST

आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चमूने शहरातील विविध चौकात पाहणी केली असता, पोलिसांचा दावा फोल असल्याचे निदर्शनास आले. उलट आॅटोचालकांची मनमानी आधीपेक्षा अधिक वाढलेली असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देआॅटोचालकांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्तनियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूकमीटरऐवजी मनमानी भाडे वसूलवाहतूक पोलीस आळा घालण्यात अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील आॅटोचालकांच्या मनमानीला आळा घातल्याचा दावा शहर वाहतूक पोलिसांकडून केला जातो. एवढेच नव्हे तर शहरातील आॅटो मीटरनुसार चालविले जावेत यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत. वेळोवेळी आॅॅटोचालकांच्या विरोधात कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. मीटरने भाडे घेण्याऐवजी मनमानी भाडे वसूल केले जाते. हा प्रकार एक-दोन चौकात नसून शहरातील सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करूनही आॅटोचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जात नाही.आॅटोचालकांच्या विरोधात नागरिक पोलिसात तक्रार दाखल करतात. परंतु त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. वाहतूक पोलीस आॅटोचालकांच्या विरोधात कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळे प्रवासीच नव्हे तर वाहनचालकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मनात येईल तेथे आॅटो उभे केले जातात. व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, महाराजबाग रोड, गणेशपेठ बसस्थानक, मेडिकल कॉलेज, अजनी रेल्वे स्टेशनसह शहराच्या सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे.सीसीटीव्ही काय कामाचे?शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, सोबतच सुरक्षा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौक व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यानंतरही आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. यामुळे पोलिसांनी चौकात व प्रमुख मार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे हा नुसता देखावा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्दळीच्या भागात अपघाताचा धोकानागपूर शहरातील ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे, उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले आहे. अपघात होऊ नये यासाठी वाहनचालक काळजीपूर्वक वाहने चालवितात. मात्र वाहतूक पोलीस असूनही आॅटो भरधाव वेगाने चालविले जातात. वर्दळीच्या भागातही आॅटो भरधाव धावतात. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो.पोलीस स्टेशन बनले पार्किगस्थळवर्दळीच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरात आॅटो उभे राहतात. आॅटो चालकांसाठी हे एक पार्किंग स्थळ बनले आहे. या मार्गावर बर्डी ते कामठी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. असे असूनही पोलीस स्टेशनपुढे आॅटो उभे राहतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परंतु सीताबर्डी पोलीस आॅटो चालकांवर कोणतीही कारवाई करीत नाही. अशीच परिस्थिती अमरावती मार्गावर आहे. व्हेरायटी चौक ते महाराज बाग मार्गावर, झाशी राणी चौक, मध्यवर्ती बस स्थानक आदी ठिकाणी आॅटोमुळे वाहतुकीची कोंडी होते.

टॅग्स :Automobileवाहनnagpurनागपूर