शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नागपुरात पोलिसांचा दावा फोल; आॅटोचालकांची मनमानी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:14 IST

आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चमूने शहरातील विविध चौकात पाहणी केली असता, पोलिसांचा दावा फोल असल्याचे निदर्शनास आले. उलट आॅटोचालकांची मनमानी आधीपेक्षा अधिक वाढलेली असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देआॅटोचालकांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्तनियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूकमीटरऐवजी मनमानी भाडे वसूलवाहतूक पोलीस आळा घालण्यात अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील आॅटोचालकांच्या मनमानीला आळा घातल्याचा दावा शहर वाहतूक पोलिसांकडून केला जातो. एवढेच नव्हे तर शहरातील आॅटो मीटरनुसार चालविले जावेत यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत. वेळोवेळी आॅॅटोचालकांच्या विरोधात कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. मीटरने भाडे घेण्याऐवजी मनमानी भाडे वसूल केले जाते. हा प्रकार एक-दोन चौकात नसून शहरातील सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करूनही आॅटोचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जात नाही.आॅटोचालकांच्या विरोधात नागरिक पोलिसात तक्रार दाखल करतात. परंतु त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. वाहतूक पोलीस आॅटोचालकांच्या विरोधात कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळे प्रवासीच नव्हे तर वाहनचालकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मनात येईल तेथे आॅटो उभे केले जातात. व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, महाराजबाग रोड, गणेशपेठ बसस्थानक, मेडिकल कॉलेज, अजनी रेल्वे स्टेशनसह शहराच्या सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे.सीसीटीव्ही काय कामाचे?शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, सोबतच सुरक्षा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौक व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यानंतरही आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. यामुळे पोलिसांनी चौकात व प्रमुख मार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे हा नुसता देखावा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्दळीच्या भागात अपघाताचा धोकानागपूर शहरातील ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे, उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले आहे. अपघात होऊ नये यासाठी वाहनचालक काळजीपूर्वक वाहने चालवितात. मात्र वाहतूक पोलीस असूनही आॅटो भरधाव वेगाने चालविले जातात. वर्दळीच्या भागातही आॅटो भरधाव धावतात. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो.पोलीस स्टेशन बनले पार्किगस्थळवर्दळीच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरात आॅटो उभे राहतात. आॅटो चालकांसाठी हे एक पार्किंग स्थळ बनले आहे. या मार्गावर बर्डी ते कामठी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. असे असूनही पोलीस स्टेशनपुढे आॅटो उभे राहतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परंतु सीताबर्डी पोलीस आॅटो चालकांवर कोणतीही कारवाई करीत नाही. अशीच परिस्थिती अमरावती मार्गावर आहे. व्हेरायटी चौक ते महाराज बाग मार्गावर, झाशी राणी चौक, मध्यवर्ती बस स्थानक आदी ठिकाणी आॅटोमुळे वाहतुकीची कोंडी होते.

टॅग्स :Automobileवाहनnagpurनागपूर