शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क  : पोलीस आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:34 IST

दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देसंवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.सीएएच्या विरोधात दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. गुप्तचर विभागाने या प्रकारच्या घटना देशाच्या प्रमुख शहरात होण्याची शक्यता वर्तविली आहे. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यासोबतच ते सत्ताकेंद्रही मानले जाते. याकडे पाहून शहर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदार आणि अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांशी संपर्क साधून संवेदनशील परिसराची गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवून त्यांची धरपकड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे. सामाजिक नेत्यांशी चर्चा करून शांती राखण्यासाठी मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाणेदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी जवळ असल्यामुळे शहर पोलीस सावधानता बाळगत आहेत. या बैठकीत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त नीलेश भरणएसह वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपराजधानीतील नागरिक शांत असून त्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिल्याचे मत ‘लोकमत’ शी चर्चा करताना व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्लीHigh Alertहाय अलर्टnagpurनागपूर