शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क  : पोलीस आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:34 IST

दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देसंवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.सीएएच्या विरोधात दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. गुप्तचर विभागाने या प्रकारच्या घटना देशाच्या प्रमुख शहरात होण्याची शक्यता वर्तविली आहे. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यासोबतच ते सत्ताकेंद्रही मानले जाते. याकडे पाहून शहर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदार आणि अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांशी संपर्क साधून संवेदनशील परिसराची गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवून त्यांची धरपकड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे. सामाजिक नेत्यांशी चर्चा करून शांती राखण्यासाठी मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाणेदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी जवळ असल्यामुळे शहर पोलीस सावधानता बाळगत आहेत. या बैठकीत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त नीलेश भरणएसह वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपराजधानीतील नागरिक शांत असून त्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिल्याचे मत ‘लोकमत’ शी चर्चा करताना व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्लीHigh Alertहाय अलर्टnagpurनागपूर