शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

इंडोरामा कामगार गृह प्रकल्प गैरव्यवहारावरील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:16 IST

इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : खासगी वाद असल्याचे स्पष्ट केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.पंकज ठाकरे व इतर चौघांनी ही याचिका दाखल केली होती. योजनेवर खासदार व आमदार निधीतील रक्कम खर्च करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने हा आक्षेप निरर्थक ठरवून संबंधित रक्कम सुविधांवर, म्हणजे विद्युतीकरण व रोड बांधण्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले. तसेच, बांधकाम दर्जासंदर्भात तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये तरतूद असल्याचे नमूद केले. याचिकेतील सर्व मुद्दे योग्य ठिकाणी मांडण्याकरिता कायम ठेवण्यात येत असल्याचेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले.असे होते याचिकेतील मुद्दे२००८ मध्ये इंडोरामा संस्थेने सदस्य कामगारांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी योजना आणली. त्यासाठी एमआयडीसीकडून १६ हजार चौरस मीटरचा भूखंड मिळवला. सुरुवातीला एक घराची किंमत २ लाख ३० हजार रुपये ठरविण्यात आली होती. त्यानंतर किंमत ४ लाख ८० हजार करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १२८ तर, दुसऱ्या टप्प्यात २७२ घरे बांधण्यात आली. कामगार घरांमध्ये राहायला गेले असता पहिल्याच वर्षापासून छत गळायला लागले. भिंतींना भेगा पडल्या. घरांच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. त्यामुळे संस्थेवर कारवाई होणे आवश्यक आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर