शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपूर-अमरावती महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:22 IST

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देवाडीतील घटना : नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.धीरज रमेश फुसे (२५, आंबेडकरनगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. तो नवीन मोटरसायकल (क्र. एमएच-३१/टीसी-००२६)ने वाडीकडून नागपूरकडे जात होता. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याचे संतुलन बिघडले. त्यातच त्याची मोटरसायकल रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये धीरज हा गंभीररीत्या जखमी झाला. तेथे हजर असलेल्या नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा प्रयत्न केला असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांंनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. खड्डे त्वरित न बुजविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर विद्यापीठ परिसर (कॅम्पस्) ते नाका क्र. १० पर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. परिणामी दुचाकी चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा यातूनच अपघाताच्या घटना घडल्या. त्यानंतरही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यातच शनिवारी खड्ड्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. आतातरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याची डागडुजी करणार काय की आणखी अपघातांची प्रतीक्षा करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू