शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा; गडकरींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 10:27 IST

यावर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरींचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याचा मुद्दा लावून धरला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहिले असून, विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल, असा दावा केला आहे.

केंद्र सरकारने विदर्भातील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची घोषणा केली होती. मात्र आजतागायत या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. या मुद्यावर आता गडकरी सक्रिय झाले आहेत. ठाकरे आणि देसाई यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ‘वेद’ने दिलेले निवेदन जोडले आहे. यावर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.

या निवेदनात ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे फायदे निदर्शनास आणून दिले आहेत. या प्रकल्पातून महाराष्ट्राला वर्षाला १२ हजार ते १५ हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे त्यात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी बुटीबोरी, मिहान आणि इतर एमआयडीसी भागात सहा हजार एकर जागा उपलब्ध आहे. शिवाय पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. पेंट, टायर, पॉलिस्टर, कापड उद्योगांना याचा भरपूर फायदा होईल.

इतर कोणते फायदे?

- विदर्भात पाच लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

- वाळू, मुरुम या गौण खनिजांच्या वापरामुळे राज्य सरकारला पुढील सात वर्षांसाठी दोन ते तीन हजार कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल.

- महाजेनकोला वीज केंद्रातील राखेतून दोन हजार कोटी रुपये मिळतील.

- रिफायनरी विदर्भात आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. वाहतूक वाढल्याने व्हॅटचे उत्पन्नही वाढेल.

- उद्योग आल्याने विजेचा वापर वाढेल, ज्यामुळे ट्रान्समिशन लॉस कमी होईल.

टॅग्स :Petrolपेट्रोलNitin Gadkariनितीन गडकरीGovernmentसरकारVidarbhaविदर्भSubhash Desaiसुभाष देसाई