शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षणाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 13:45 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिका राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार, राज्य मागासवर्ग आयाेग व राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून यावर ४ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका निकाली काढताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जायला नको, असा निर्णय दिला, तसेच नागरिकांचा मागासवर्गाचे आरक्षण ठरविण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना व या आयोगाच्या शिफारशीनुसार कृती करण्याचे निर्देश दिले. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अवैध ठरवून, या प्रवर्गातील सर्व निर्वाचित उमेदवारांची पदे रिक्त झाल्याचे जाहीर केले.

या निर्णयानुसार, नागरिकांचा मागासवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी निश्चित करण्यासाठी आवश्यक अभ्यास व माहिती गोळा करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपविण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल अद्याप सादर झाला नाही. असे असताना राज्याच्या विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिवांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायदा-१९६५, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा-१९६१, महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा-१९५९, मुंबई महानगरपालिका कायदा-१९८८ आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायदा-१९४९ यामध्ये सुधारणा करून नागरिकांचा मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्यासाठी २३ सप्टेंबर २०२१ व १ ऑक्टोबर २०२१ रोजी वटहुकूम जारी केले.

त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाविषयी ८ व ९ नोव्हेंबर २०२१ रोजी परिपत्रके काढली. हे वटहुकूम व परिपत्रके अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अक्षय नाईक, निवडणूक आयोगातर्फे ॲड. जेमिनी कासट तर, राज्य सरकारतर्फे ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

सध्या स्थगिती देण्यास नकार

याचिकाकर्त्याने वादग्रस्त वटहुकूमांवर अंतरिम स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होतपर्यंत ही विनंती मान्य करण्यास नकार दिला, तसेच या विनंतीवर पुढच्या तारखेला विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षण