शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास

By आनंद डेकाटे | Updated: May 21, 2024 17:14 IST

अंनिसचे संघटक पंकज वंजारे : युवा व्यक्तिमत्व - वक्तृत्व, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संतांनी आपल्या साहित्यातून आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आणि तत्वज्ञान दिले आहे. ज्याची आजच्या पिढीला नितांत गरज असून संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे यांनी केले. 

विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग येथे 'राष्ट्रसंतांच्या मूल्यांतील व्यक्तिमत्व - संवाद कौशल्य विकास' या विषयावर तीन दिवसीय युवा प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ युथ ऑर्गनाईजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून वंजारे मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग प्रमुख डाॅ. प्रमोद वाटकर, डॉ. धनंजय सोनटक्के उपस्थित होते.  

वंजारे यांनी 'संतांचा जीवन दृष्टीकोन, वेळ, करिअरचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना  संत कबीर , संत रोहीदास, ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास , राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांच्या साहित्यातील दाखले देत संत कोणाला म्हणावे हे पटवून दिले. संत ज्ञानेश्वर माऊली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पर्यंत संतांनी समाजात मानवी मूल्ये रुजवली आहे. संतांनी कोण्या एका जाती, धर्माची कास धरली नाही. कर्म हाच मनुष्याचा धर्म असल्याचे संत रविदास यांनी सांगितले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर २५०० बुद्ध जयंती साजरी करताना नागरिकांना समयदान मागितले होते. संत प्रचंड क्रांतिकारक होते. संतांनी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान वाटण्याचे आवाहन केले होते. संतांनी समाज सुधारणा केली. समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी केल्याचे वंजारे म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर