शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास

By आनंद डेकाटे | Updated: May 21, 2024 17:14 IST

अंनिसचे संघटक पंकज वंजारे : युवा व्यक्तिमत्व - वक्तृत्व, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संतांनी आपल्या साहित्यातून आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आणि तत्वज्ञान दिले आहे. ज्याची आजच्या पिढीला नितांत गरज असून संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे यांनी केले. 

विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग येथे 'राष्ट्रसंतांच्या मूल्यांतील व्यक्तिमत्व - संवाद कौशल्य विकास' या विषयावर तीन दिवसीय युवा प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ युथ ऑर्गनाईजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून वंजारे मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग प्रमुख डाॅ. प्रमोद वाटकर, डॉ. धनंजय सोनटक्के उपस्थित होते.  

वंजारे यांनी 'संतांचा जीवन दृष्टीकोन, वेळ, करिअरचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना  संत कबीर , संत रोहीदास, ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास , राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांच्या साहित्यातील दाखले देत संत कोणाला म्हणावे हे पटवून दिले. संत ज्ञानेश्वर माऊली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पर्यंत संतांनी समाजात मानवी मूल्ये रुजवली आहे. संतांनी कोण्या एका जाती, धर्माची कास धरली नाही. कर्म हाच मनुष्याचा धर्म असल्याचे संत रविदास यांनी सांगितले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर २५०० बुद्ध जयंती साजरी करताना नागरिकांना समयदान मागितले होते. संत प्रचंड क्रांतिकारक होते. संतांनी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान वाटण्याचे आवाहन केले होते. संतांनी समाज सुधारणा केली. समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी केल्याचे वंजारे म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर