शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:05 IST

विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देपूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचा कार्यगोरव सोहळा शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील डॉ. देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पूरणचंद्र्र मेश्राम व त्यांच्या पत्नी डॉ. राजर्षी मेश्राम यांचा शाल, मानपत्र, व तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन कार्याचा गौरव करण्यात आला. विविध संघटनांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते.आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी आपला आजचा सत्कार हा माझी आई, लहान बहीण आणि पत्नी या तीन महिला शक्तींना समर्पित करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना विषद करीत आठवणींना उजाळा दिला.यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. जोगेंद्र कवाडे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांनी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. कार्याध्यक्ष डॉ. अनिल हिरेखण यांनी आभार मानले.यावेळी आयोजन समितीचे डॉ. नीरज बोधी, डॉ. शकील सत्तार, डॉ, आमप्रकाश चिमणकर, डॉ. मिलिंद साठे,, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी व्यासपीठावर होते.संविधानाच्या रक्षणाची आज गरजआपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज भारतीय संविधान वाचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. एससीएसटीला क्रिमिलेयर लागू करण्याचा प्रयत्न होतोय. ते होता कामा नये, यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरावे लागेल. कार्यक्षमतेच्या बोगस नावाखाली एससीएसटीला संधीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजाने या विषयावर चिंतन करावे, असे आवाहनही केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर