शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 21:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे २६ टक्क्यांनी वाढला निकाल, विभाग सहाव्या क्रमांकावर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘कोरोना’मुळे भूगोल विषयाची परीक्षाच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क २६ टक्क्यांनी वाढला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.८४ टक्के इतकीच आहे. यंदा राज्यात विभाग सहाव्या स्थानी आहे.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७८ हजार ६८९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ३६८ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७८ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.९९ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६१ हजार ३८८ पैकी १ लाख ५१ हजार ४४४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी आहे. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १६ हजार ७४२ पैकी केवळ १५ हजार ४१९ म्हणजे ९२.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तेथील निकाल तब्बल २७ टक्क्यांनी वाढला आहे.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा निकाल (२०२०) निकाल (२०१९)भंडारा ९४.४१ %          ६५.९९ %चंद्रपूर ९२.४४ %         ६५.५८ %नागपूर ९४.६६ %        ७१.७४ %वर्धा ९२.१० %             ६५.०५ %गडचिरोली ९२.६९ % ५४.६५ %गोंदिया ९५.२२ %      ६८.४६ %

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर