शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 21:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे २६ टक्क्यांनी वाढला निकाल, विभाग सहाव्या क्रमांकावर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘कोरोना’मुळे भूगोल विषयाची परीक्षाच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क २६ टक्क्यांनी वाढला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.८४ टक्के इतकीच आहे. यंदा राज्यात विभाग सहाव्या स्थानी आहे.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७८ हजार ६८९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ३६८ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७८ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.९९ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६१ हजार ३८८ पैकी १ लाख ५१ हजार ४४४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी आहे. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १६ हजार ७४२ पैकी केवळ १५ हजार ४१९ म्हणजे ९२.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तेथील निकाल तब्बल २७ टक्क्यांनी वाढला आहे.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा निकाल (२०२०) निकाल (२०१९)भंडारा ९४.४१ %          ६५.९९ %चंद्रपूर ९२.४४ %         ६५.५८ %नागपूर ९४.६६ %        ७१.७४ %वर्धा ९२.१० %             ६५.०५ %गडचिरोली ९२.६९ % ५४.६५ %गोंदिया ९५.२२ %      ६८.४६ %

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर