शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

टॉपर्सचा टक्का घसरला

By admin | Updated: May 22, 2016 02:43 IST

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत विज्ञान, वाणिज्य व मानव्य शास्त्र या तिन्ही शाखांमध्ये टॉपर्सचा टक्का घसरला आहे. गणित व इंग्रजीमुळे ही अडचण झाल्याचे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विज्ञान शाखेची टक्केवारी दोन टक्क्यांनी, वाणिज्य व मानव्यशास्त्र शाखेची टक्केवारी एका टक्क्यांनी घसरली आहे. विज्ञानात सलग दोन वर्षापासून तिन्ही शाखेत मुलीचाच वरचष्मा असायचा.यंदा वाणिज्य शाखेत एस. अरविंदने मुलींना मागे टाकले. २०१५ मध्ये सीबीएसईच्या निकालात विज्ञान शाखेचा टॉपरने ९७.४ टक्के, वाणिज्य शाखेत ९७.४ व मानव्यशास्त्र शाखेत ९६.२ टक्के गुण मिळविले होते. यावर्षी विज्ञान शाखेमध्ये टॉपराला ९५.८, वाणिज्य मध्ये ९६.८ व मानव्यशास्त्र शाखेत ९५.४ टक्के गुण मिळाले आहे. शहरातील २० शाळांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. सामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात, असा समज आहे. परंतु मागील तीन वर्षांप्रमाणेच यंदादेखील निकालांत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला.