शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

नागपुरात स्वस्त घरांच्या नावाखाली लोकांचा ‘विश्वासघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:25 IST

नागपूर शहरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनेवर विश्वास ठेवून तब्बल ९४ हजार ३३६ लोकांनी अर्ज केले. यातील ७२ हजार १३ अर्जात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नव्हत्या. आज ना उद्या आपल्याला स्वस्त घर मिळेल अशी आशा अर्जधारकांना होती. परंतु अर्जधारकांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

ठळक मुद्देमनपाकडे आलेले ९४ हजार अर्ज कचऱ्यात :अर्जाचा खर्चही पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली गेल्या वर्षी महापालिका व शासकीय पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनेवर विश्वास ठेवून तब्बल ९४ हजार ३३६ लोकांनी अर्ज केले. यातील ७२ हजार १३ अर्जात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नव्हत्या. आज ना उद्या आपल्याला स्वस्त घर मिळेल अशी आशा अर्जधारकांना होती. परंतु अर्जधारकांच्या आशेवर पाणी फेरले आहे.नागपूर महागर विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए) घोषणा केली की, जुने अर्ज विचारात घेतले जाणार नाही. त्यांना नव्याने अर्ज करावे लागतील. ज्या घर हवे त्यांनी पुन्हा ऑनलाईन अर्ज, डिमांड व निर्धारित शुल्क द्यावे लागेल. याची सोडत काढली जाईल. त्यानुसार रविवारी सोडत काढण्यात आली. अर्जांची संख्या कमी होऊ न ८४८१ झाली. त्यामुळे ज्या हजारो लोकांनी शासन व महापालिके च्या पोर्टलवर अर्ज केले त्यांना स्वस्त घर मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.लोकांना घरे द्यावयाचीच नव्हती तर सरकार व सत्तापक्षाची पाठराखण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित कशासाठी केले? हा लोकांचा विश्वासघात आहे. ९ डिसेंबर २०१५ रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली. चार घटकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला. मनपाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली. मनपाने लोकांकडून डिमांड मागावी व योजना कार्यान्वित करून गती द्यावी. तर नासुप्र (सध्या एनएमआरडीए) यांच्याकडे स्वस्त घरे बांधण्याची जबाबदारी सोविण्यात आली.मनपाच्या पोर्टलवर ऑनलाईन ४१४७८ अर्ज व सरकारच्या पोर्टलवर १५ डिसेंबर २०१८ पर्यत ५२,८५८ अर्ज आले. त्यानुसार वर्ष २०१७-१८ या वर्षात १०७०४ घरे उभारण्याची योजना नासुप्रने हाती घेतली. वाठोडा, तरोडीखूर्द, वांजरी येथे ४३४५ घरांची योजना, चिखली, वांजरा व वडधामना येथे म्हाडाची २३३६ घरांची योजना व १११८ घरांची नारी व वांजरा येथे एसआरए अंतर्गत घरे उभारली जात आहेत. वर्ष २०१८-१९ मध्ये शहरात २१,४०७ फ्लॅट बांधण्याची घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात सध्या ३०१४ घरकुलांचेच काम अंतिम टप्प्यात आहे.मनपाचा प्रस्ताव एनएमआरडीए नाकारलामनपात घटक तीन अंतर्गत आलेल्या अर्जांची पडताळणी ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट संस्थेकडून करण्यात आली. यातील पात्र १६ हजार लाभार्थींची यादी एनएमआरडीए यांच्याकडे पाठविण्यात आली. परंतु एनएमआरडीएने यातील एकही अर्ज स्विकारला नाही. स्वत:च्या स्तरावर अर्ज मागवून ड्रॉ काडून घरे देण्याची घोषणा केली. म्हणजेच नोडल एजन्सी असलेल्या महापालिकेच्या शिफारशींना एनएमआरडीएने धुडकावले. यात सरकारनेही बघ्याची भूमिका घेतली.वेळ आल्यावर धडा शिकवूएनएमआरडीएने रविवारी काढलेल्या ऑनलाईन सोडतीची माहिती अर्जधारकांना दिली होती. त्यानुसार अर्जधारक आले. परंतु त्यांना मनस्तापच सहन करावा लागला. यातून चुकीचा संदेश गेला आहे. त्रस्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. अर्जधारकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. नासुप्र बरखास्त झाली. पण एनएमआरडीएच्या स्वरुपात लोकांचा छळ सुरूच आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली विश्वासघात केला, आता आम्ही विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा संतप्त भावना लोकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाnagpurनागपूर