शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पहाटेच्या शपथविधीच्या दिवशीच जनता हिशेब घेईल - सुषमा अंधारे

By कमलेश वानखेडे | Updated: October 18, 2024 21:16 IST

मी निवडणूक लढण्यापेक्षा ताकदीने प्रचार करेल, अंधारेंची माहिती.

कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुती सरकारचा पहाटेचा शपथ विधी २३ नोव्हेंबरला झाला होता. यावेळी विधानसभेचा निकालही २३ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपच्या फोडा फोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करेल, असा टोला उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलता अंधारे म्हणाल्या, जागा वाटपाची बोलणी अनिल देसाई आणि संजय राऊत करत आहेत. काही जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यात पारनेर, हडपसर आहे. कुटुंबातील लहान बहीन म्हणून सांगते, दोन पाऊल आम्ही मागे जातो, दोन पाऊल तुम्हीही मागे घ्या. किमान बैठकीला बसून रहा, निघून गेले तर चर्चा कशी होईल, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले. मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे, अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो. मशाल पेटवण्यासाठी मदत करू असे बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्यासमोर तशी भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.

रामटेकसाठी आम्ही मोठं मन केले- लोकसभेच्या वेली आम्ही रामटेकची जागा काँग्रेससाठी सोडली. त्यावेळी खासदार आमच्या पक्षाचे होते. पण मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही ते स्वीकारले. आम्ही प्रचार सुद्धा केला, असे सांगत विधानसभेत मात्र रामटेकसाठी उद्धव सेना आग्रही असल्याचे संकेत त्यांनी दिले. कॉंग्रेस उमेदवाराचा सांगलीतला अनुभव हा वेदनादायी आहे. तो विसरणे कठीण आहे, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

फडणवीस यांची जागा धोक्यात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात आहे. महाराष्ट्र भाजपच्या मालकाची सीट धोक्यात असल्याचे अनेक सर्व्हे सांगत सांगत आहेत, असा दावा करीत आमच्या वाट्याला दक्षिण पश्चिम आली तर आम्ही लढू, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेnagpurनागपूर