शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

"लोकंच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:44 IST

प्रा. देविदास घोडेस्वार : संविधान अमृत महोत्सव व्याख्यानमाला.

नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या, नेत्याच्या किंवा पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. त्यासाठी द्वेष, भेदभाव बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. वेळ आणि परिस्थिती अनुकूल असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही. या देशातील लोकच संविधान-लोकशाही जिवंत ठेवू शकतात त्यामुळे नागरिकांनीच यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपाद संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव व संविधान अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागातर्फे अमरावती रोडवरील दीक्षांत सभागृहात 'संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. विभागातर्फे वर्षभरात अशी ७५ व्याख्याने होणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.शामराव कोरेटी होते.

प्रा. देविदास घोडेस्वार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेला येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकद लावली होती. त्यांचा मुंबईकडून पराभव झाला. बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नाने ते विजयी झाले. मुंबईतील काँग्रेस सदस्य जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवरून त्यांना बिनविरोध निवडून आणणे काँग्रेसला भाग पडले. कारण संविधानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आवश्यक झाले होते. पं. जवाहरलाल नेहरूंनी संविधान कसे असावे यासाठी ८ मुद्द्यांवर प्रस्ताव मांडला होता. यावर चर्चा सुरू झाल्यावर प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बोलण्याची संधी देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र कसे असावे याची संपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले की, प्रस्तावात फक्त हक्क नमूद केले आहेत, परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी दिलेली नाही. जेव्हा संरक्षणाची हमी दिली जाईल तेव्हाच अधिकार यशस्वी होतील. हा देश आणि राष्ट्र आपले आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. देशाला एकसंध ठेवायचे असेल, तर बहुमताच्या जोरावर निर्णय घेण्याऐवजी संवादातून निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले असल्याचे घोडेस्वार म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ.अविनाश फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.

टॅग्स :nagpurनागपूर