शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"लोकंच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:44 IST

प्रा. देविदास घोडेस्वार : संविधान अमृत महोत्सव व्याख्यानमाला.

नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या, नेत्याच्या किंवा पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. त्यासाठी द्वेष, भेदभाव बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. वेळ आणि परिस्थिती अनुकूल असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही. या देशातील लोकच संविधान-लोकशाही जिवंत ठेवू शकतात त्यामुळे नागरिकांनीच यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपाद संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव व संविधान अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागातर्फे अमरावती रोडवरील दीक्षांत सभागृहात 'संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. विभागातर्फे वर्षभरात अशी ७५ व्याख्याने होणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.शामराव कोरेटी होते.

प्रा. देविदास घोडेस्वार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेला येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकद लावली होती. त्यांचा मुंबईकडून पराभव झाला. बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नाने ते विजयी झाले. मुंबईतील काँग्रेस सदस्य जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवरून त्यांना बिनविरोध निवडून आणणे काँग्रेसला भाग पडले. कारण संविधानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आवश्यक झाले होते. पं. जवाहरलाल नेहरूंनी संविधान कसे असावे यासाठी ८ मुद्द्यांवर प्रस्ताव मांडला होता. यावर चर्चा सुरू झाल्यावर प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बोलण्याची संधी देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र कसे असावे याची संपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले की, प्रस्तावात फक्त हक्क नमूद केले आहेत, परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी दिलेली नाही. जेव्हा संरक्षणाची हमी दिली जाईल तेव्हाच अधिकार यशस्वी होतील. हा देश आणि राष्ट्र आपले आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. देशाला एकसंध ठेवायचे असेल, तर बहुमताच्या जोरावर निर्णय घेण्याऐवजी संवादातून निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले असल्याचे घोडेस्वार म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ.अविनाश फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.

टॅग्स :nagpurनागपूर