शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमदारांना पेन्शन, शिक्षकांना का नाही?; विक्रम काळे यांचा विधान परिषदेत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 06:27 IST

जे आमदार पाच वर्षांसाठी  निवडून येतात, त्यांना पेन्शन मिळते; पण तीस वर्षे काम करूनही शिक्षक व  कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, हा विरोधाभास योग्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जे आमदार पाच वर्षांसाठी  निवडून येतात, त्यांना पेन्शन मिळते; पण तीस वर्षे काम करूनही शिक्षक व  कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केली.

महाराष्ट्रातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पेन्शन म्हणजेच जुनी पेन्शन योजनेकडे लक्षवेधीच्या माध्यमातून काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.  राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून पुढे सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागून करण्यात आली. मात्र, यापूर्वी जे कर्मचारी सेवेत आले त्यांच्या शाळेला अनुदान नसल्याने त्यांना जुनी पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागले. या शिक्षकांचा विषय आमदार काळे यांनी सभागृहात मांडला. या प्रश्नाकरिता लाखो शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोर्चा विधानभवनाकडे आला असल्याची माहिती त्यांनी दिली.   

नवीन पेन्शन योजना लागू केली तर सरकारच्या तिजोरीवर याचा ९ हजार ५०० कोटींचा बोजा पडणार आहे. तर जुनी योजना लागू केल्यास १ लाख १५ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन याेजना लागू करणे शक्य नाही. २००५ पूर्वीच्या शंभर टक्के अनुदान मिळत असलेल्या शाळांतील शिक्षकांना जुन्या  पेन्शन योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सदस्य नागोराव गाणार, कपिल पाटील, सतीश चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVikram Kaleविक्रम काळे