शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेंच डावा कालवा फुटला : लाखो लिटर पाणी गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:58 IST

पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गुंढरी (पंडे) गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर (पारशिवनी) : पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.पेंच जलाशयाच्या कालव्याला ठिकठिकाणी लहान मोठे सिपेज आहेत. याकडे पेंच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. अशातच सोमवारी सकाळी ६ वाजता पेंचपासून ६ कि.मी. अंतरावर गुंढरी (पंडे) गावाजवळ कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले. स्थानिक शेतकरी अविनाश सांगोडे यांनी ही माहिती संबंधित विभागाच्या सर्वेअरला कळविली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने भगदाडामुळे कालव्याच्या सरक्षक भिंतीला तडा गेल्या. पाटबंधारे विभागाने सकाळी ९ वाजता कालवा बंद केला. त्यामुळे पाण्याचा वेग कमी झाला. तोवर सिंचनाचे लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याच्या शेजारी मोतीलाल सांगोडे यांची शेती होती. यात धानाचे पीक होते. ते पाण्यामुळे वाहून गेले. यात सांगोडे यांचे मोठे नुकसान झाले.कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्षपेंचच्या डाव्या कालव्याची अवस्था बिकट आहे. ठिकठिकाणी पॅचेसला भेगा पडल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कामचलावू स्वरुपाची करण्यात आली.दरवर्षी मेंटनन्सच्या नावावर लाखो रुपये खर्च होतो, तरी कालवा फुटण्याच्या घटना कमी झालेल्या नाही. त्यामुळे मेंटनन्स नेमका कशाचा होतो आहे, हा संशोधनाचा विषय आहे.पेंचच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था वाईट आहे. शासन शेतकऱ्यांकडून शेतीचा वायदा वसूल करते. मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.अ‍ॅड.आशिष जयस्वालअध्यक्ष, राज्य खनिकर्म महामंडळ

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर