शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 11:51 IST

तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा धम्मसंदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवस्थेसोबत चालत आलेली दृष्टी व जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आज गरज आहे. हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.इंदोरा बुद्ध विहार येथे जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा धम्मसंदेश बौद्ध अनुयायांना दिला आहे. कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा व जगभरात प्रेरणा निर्माण करा. माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि इतरांचा द्वेष करीत असला तरी तो उजेडात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, प्रेम करा व प्रेमाची फुले निर्माण करा; कारण जगाला आज बुद्धाच्या शांतता, करुणा व प्रज्ञेची खरी गरज आहे.आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळविणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विजय होईल व तो तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाईटाने वाईटावर मात करता येऊ शकत नाही.तिरस्कार केवळ प्रेमानेच संपविला जाऊ शकतो, असे विचार त्यांनी दिले. आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेला कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. तुम्ही चांग

ल्या पुस्तकांचे वाचन करता, त्यातील विचार आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक चांगला शब्द महत्त्वाचा आहे.जग सध्या संकुचनाच्या मार्गावर चालत आहे. यामुळे विश्वावर युद्धाचे ढग जमा होत आहेत. पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत भदंत सुरई ससाई यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचाराने स्वत:च्या अंतरंगातील दीप चेतविण्याचे आवाहन या धम्मसंदेशात केले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा