शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 11:51 IST

तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा धम्मसंदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवस्थेसोबत चालत आलेली दृष्टी व जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आज गरज आहे. हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.इंदोरा बुद्ध विहार येथे जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा धम्मसंदेश बौद्ध अनुयायांना दिला आहे. कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा व जगभरात प्रेरणा निर्माण करा. माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि इतरांचा द्वेष करीत असला तरी तो उजेडात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, प्रेम करा व प्रेमाची फुले निर्माण करा; कारण जगाला आज बुद्धाच्या शांतता, करुणा व प्रज्ञेची खरी गरज आहे.आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळविणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विजय होईल व तो तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाईटाने वाईटावर मात करता येऊ शकत नाही.तिरस्कार केवळ प्रेमानेच संपविला जाऊ शकतो, असे विचार त्यांनी दिले. आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेला कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. तुम्ही चांग

ल्या पुस्तकांचे वाचन करता, त्यातील विचार आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक चांगला शब्द महत्त्वाचा आहे.जग सध्या संकुचनाच्या मार्गावर चालत आहे. यामुळे विश्वावर युद्धाचे ढग जमा होत आहेत. पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत भदंत सुरई ससाई यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचाराने स्वत:च्या अंतरंगातील दीप चेतविण्याचे आवाहन या धम्मसंदेशात केले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा