शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 11:51 IST

तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा धम्मसंदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवस्थेसोबत चालत आलेली दृष्टी व जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आज गरज आहे. हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.इंदोरा बुद्ध विहार येथे जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा धम्मसंदेश बौद्ध अनुयायांना दिला आहे. कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा व जगभरात प्रेरणा निर्माण करा. माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि इतरांचा द्वेष करीत असला तरी तो उजेडात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, प्रेम करा व प्रेमाची फुले निर्माण करा; कारण जगाला आज बुद्धाच्या शांतता, करुणा व प्रज्ञेची खरी गरज आहे.आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळविणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विजय होईल व तो तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाईटाने वाईटावर मात करता येऊ शकत नाही.तिरस्कार केवळ प्रेमानेच संपविला जाऊ शकतो, असे विचार त्यांनी दिले. आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेला कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. तुम्ही चांग

ल्या पुस्तकांचे वाचन करता, त्यातील विचार आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक चांगला शब्द महत्त्वाचा आहे.जग सध्या संकुचनाच्या मार्गावर चालत आहे. यामुळे विश्वावर युद्धाचे ढग जमा होत आहेत. पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत भदंत सुरई ससाई यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचाराने स्वत:च्या अंतरंगातील दीप चेतविण्याचे आवाहन या धम्मसंदेशात केले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा