शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

निकाल हवा असेल तर शाळेची फी भरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:09 IST

नागपूर : राज्य आणि सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच इंटरनल असेसमेंटच्या आधारे ...

नागपूर : राज्य आणि सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच इंटरनल असेसमेंटच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्राची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी वसुलीसाठी सतत फोन येत आहेत. फी न भरल्यास निकाल मिळणार नाही, असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाल्य वर्षभर शाळेला गेला नसल्याने शाळेची फी कशी द्यायची, यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रम आहे. पण, शाळा पालकांकडून १०० टक्के फी वसुलीवर भर देत आहेत. याबाबत पालक संघटनांनी शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पण, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याच कारणांनी शाळांच्या व्यवस्थापनाने उर्वरित फी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. पालक म्हणाले, फी कशी भरायची, हा प्रश्न आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, तर व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. अशावेळी घरची व्यवस्था बघायची, की शाळेची फी भरायची. शाळेकडून फी भरण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत आहे.

फी ५० टक्के माफ करा

कोरोना आणि लॉकडाऊनची स्थिती पाहता अनेक पालक संघटनांनी आंदोलन करून ५० टक्के फी माफ करण्याची मागणी केली होती. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. फी माफ केल्यास पालकांवर भार पडणार नाही. लॉकडाऊनमध्ये फी वसूल करणे योग्य नाही. मुलांनी शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात पालकांवर फीसाठी दबाव टाकणे योग्य नाही.

एका शाळेचे व्यवस्थापक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, पालकांची नोकरी आणि व्यवसायाच्या समस्येसह शाळांनाही आर्थिक समस्या आहे. शाळेच्या सुविधा, शिक्षकांचे पगार आणि अन्य देखरेख खर्चासाठी शाळेलाही खर्च येत आहे. अशावेळी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या फीवर चालते. फी मिळाली नाही तर शाळा चालवायची कशी, शिक्षकांना पगार कसा द्यायचा आणि इतर खर्च कसा करायचा, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.

कर्जावर सुरू आहे घरचा खर्च

सीबीएसई शाळेच्या एका विद्यार्थ्याचे पालक सतीश विश्वास म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. कर्जावर घराचा खर्च सुरू आहे. अशा स्थितीतही मुलाला शिकवायचे आहे. मुलगा वर्षभर शाळेत गेला नाही, तर फी कशी द्यायची, हा प्रश्न आहे. आर्थिक जुळवाजुळव करून मुलाची ५० टक्के फी भरण्यास तयार आहे. शाळेने सूट द्यावी.