शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

निकाल हवा असेल तर शाळेची फी भरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:09 IST

नागपूर : राज्य आणि सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच इंटरनल असेसमेंटच्या आधारे ...

नागपूर : राज्य आणि सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच इंटरनल असेसमेंटच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्राची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी वसुलीसाठी सतत फोन येत आहेत. फी न भरल्यास निकाल मिळणार नाही, असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाल्य वर्षभर शाळेला गेला नसल्याने शाळेची फी कशी द्यायची, यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रम आहे. पण, शाळा पालकांकडून १०० टक्के फी वसुलीवर भर देत आहेत. याबाबत पालक संघटनांनी शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पण, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याच कारणांनी शाळांच्या व्यवस्थापनाने उर्वरित फी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. पालक म्हणाले, फी कशी भरायची, हा प्रश्न आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, तर व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. अशावेळी घरची व्यवस्था बघायची, की शाळेची फी भरायची. शाळेकडून फी भरण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत आहे.

फी ५० टक्के माफ करा

कोरोना आणि लॉकडाऊनची स्थिती पाहता अनेक पालक संघटनांनी आंदोलन करून ५० टक्के फी माफ करण्याची मागणी केली होती. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. फी माफ केल्यास पालकांवर भार पडणार नाही. लॉकडाऊनमध्ये फी वसूल करणे योग्य नाही. मुलांनी शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात पालकांवर फीसाठी दबाव टाकणे योग्य नाही.

एका शाळेचे व्यवस्थापक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, पालकांची नोकरी आणि व्यवसायाच्या समस्येसह शाळांनाही आर्थिक समस्या आहे. शाळेच्या सुविधा, शिक्षकांचे पगार आणि अन्य देखरेख खर्चासाठी शाळेलाही खर्च येत आहे. अशावेळी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या फीवर चालते. फी मिळाली नाही तर शाळा चालवायची कशी, शिक्षकांना पगार कसा द्यायचा आणि इतर खर्च कसा करायचा, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.

कर्जावर सुरू आहे घरचा खर्च

सीबीएसई शाळेच्या एका विद्यार्थ्याचे पालक सतीश विश्वास म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. कर्जावर घराचा खर्च सुरू आहे. अशा स्थितीतही मुलाला शिकवायचे आहे. मुलगा वर्षभर शाळेत गेला नाही, तर फी कशी द्यायची, हा प्रश्न आहे. आर्थिक जुळवाजुळव करून मुलाची ५० टक्के फी भरण्यास तयार आहे. शाळेने सूट द्यावी.