शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:33 IST

राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे,

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे, परंतु शासन लक्ष देत नाही, अशी खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली. या अधिवेशनात तरी आम्हाल न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली.राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत २३८८ अनुदानित मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह आहेत. ही वसतिगृह १९५१ पासून अनुदान तत्त्वावर चालविली जातात. वाढत्या महागाईच्या तुलनेत केवळ आठ हजार मानधन मिळते. या तुटपुंज्या मानधनाला कंटाळून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी संघटनेने आतापर्यंत अनेक आंदोलन झाले, मोर्चे काढले परंतु न्याय मिळाला नाही. परंतु नव्या सरकारकडून, समान वेतन, समान काम यानुसार आम्हाला अनेक अपेक्षा असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचे नेतृत्व सतीश गोटमुखले, आयुब शेख, मनोज गोसावी, दत्तात्रय पाटील, राहुल झोडापे, भाऊ कुनगाटकर, व अशोक जाधव यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाEmployeeकर्मचारी