शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

By admin | Updated: November 12, 2014 00:58 IST

नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.

‘व्हीईएजी’ची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावानागपूर : नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा चर्चा करण्यात आली. ‘व्हीईएजी’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात बैठकीतील मुद्दे मांडण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री याकडे तातडीने लक्ष देऊन ते सोडवतील, अशी अपेक्षा संघटनेचे संयोजक सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केली आहे. नाग नदी आणि अंबाझरी तलावाचे संवर्धन व पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. नाग नदी शुद्धीकरणाच्या योजनेची सुरुवात फडणवीस महापौर असताना झाली होती. केंद्राकडून मदत घेऊन नाग नदीचा कायापालट केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे. नाग नदी डिनोटिफाईड झाल्यास तलावाच्या परिसरातील बांधकाम संपुष्टात येऊ शकते, असेही पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे. कोराडी येथे १९८० मेगावॅट वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी वाढण्याचा धोका आहे. वीज प्रकल्पाचा विस्तार शहरशेजारी करण्यात आला आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अनेक शिफारशी या प्रकल्पाने धुडकावून लावल्या आहेत. फ्लाय गॅस डिसल्फरायझेशन लावणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आलेले नाही. दूषित पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही, याकडेही पालीवाल यांनी लक्ष वेधले आहे. विदर्भाच्या विविध भागात मोठे वीज प्रकल्प उभारण्याला आमचा ठाम विरोध आहे. भंडाऱ्यात ओलिताखालील शेतजमिनीवर उभारण्यात येणारा वीज प्रकल्प थांबवण्यात यावा. शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतातून वीज प्रवाहाचे टॉवर उभारणे ही या भागातील आणखी एक समस्या आहे.वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्सचा शोध घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे. पायाभूत सोयींच्या नावाखाली वाईल्ड लाइफ कॉरिडॉर्स उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हायवेवरील मोठे वृक्ष अन्य ठिकाणी जगतील याची काळजी घेण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व प्रश्न माहीत असल्याने या सर्व मुद्यांवर ठोस धोरण जाहीर करतील, असा विश्वास पालीवाल यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कमल सिंग, परमजित आहुजा, आशिष डगवार,आकाश मिश्रा, डॉ. नईम खान, संगीता मिश्रा यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. (प्रतिनिधी)