शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

By admin | Updated: November 12, 2014 00:58 IST

नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.

‘व्हीईएजी’ची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावानागपूर : नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा चर्चा करण्यात आली. ‘व्हीईएजी’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात बैठकीतील मुद्दे मांडण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री याकडे तातडीने लक्ष देऊन ते सोडवतील, अशी अपेक्षा संघटनेचे संयोजक सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केली आहे. नाग नदी आणि अंबाझरी तलावाचे संवर्धन व पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. नाग नदी शुद्धीकरणाच्या योजनेची सुरुवात फडणवीस महापौर असताना झाली होती. केंद्राकडून मदत घेऊन नाग नदीचा कायापालट केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे. नाग नदी डिनोटिफाईड झाल्यास तलावाच्या परिसरातील बांधकाम संपुष्टात येऊ शकते, असेही पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे. कोराडी येथे १९८० मेगावॅट वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी वाढण्याचा धोका आहे. वीज प्रकल्पाचा विस्तार शहरशेजारी करण्यात आला आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अनेक शिफारशी या प्रकल्पाने धुडकावून लावल्या आहेत. फ्लाय गॅस डिसल्फरायझेशन लावणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आलेले नाही. दूषित पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही, याकडेही पालीवाल यांनी लक्ष वेधले आहे. विदर्भाच्या विविध भागात मोठे वीज प्रकल्प उभारण्याला आमचा ठाम विरोध आहे. भंडाऱ्यात ओलिताखालील शेतजमिनीवर उभारण्यात येणारा वीज प्रकल्प थांबवण्यात यावा. शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतातून वीज प्रवाहाचे टॉवर उभारणे ही या भागातील आणखी एक समस्या आहे.वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्सचा शोध घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे. पायाभूत सोयींच्या नावाखाली वाईल्ड लाइफ कॉरिडॉर्स उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हायवेवरील मोठे वृक्ष अन्य ठिकाणी जगतील याची काळजी घेण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व प्रश्न माहीत असल्याने या सर्व मुद्यांवर ठोस धोरण जाहीर करतील, असा विश्वास पालीवाल यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कमल सिंग, परमजित आहुजा, आशिष डगवार,आकाश मिश्रा, डॉ. नईम खान, संगीता मिश्रा यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. (प्रतिनिधी)