शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘पवार’बाह्य मुख्यमंत्री शिक्षक संघटनांना खुपतात - विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:44 IST

शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही.

- योगेश पांडेनागपूर : शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. परंतु ‘पवार’बाह्य मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री झाल्यामुळे शिक्षक संघटनांना शाळाबाह्य कामांच्या मुद्याची आठवण आली आहे, या शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांवर टीकास्त्र सोडले.शालेय तसेच उच्च शिक्षणासंदर्भातील विविध मुद्यांवर तावडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड होऊन निवड प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक पदांची भरती ‘पवित्र’ या केंद्रीय परीक्षा पध्दतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याविरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. मात्र न्यायालयाने शासनाची भूमिका उचलून धरली.मुळात पैसे देऊन नोकरी मिळविल्यानंतर हेच शिक्षक आंदोलने करतात व प्रशासन-मंत्र्यांना शिव्यांची लाखोळी वाहतात. या ‘पवित्र’मुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येणार असल्याचा त्यांनी दावा केला.शिक्षक आमदारांचे गणित कच्चेपटसंख्या कमी असणा-या आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या जिल्हा परिषदेच्या राज्यातील १ हजार ३१७ प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त १३ हजार विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित करावे लागेल. मात्र काही शिक्षक आमदार याला राजकीय स्वरूप देत असून यामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित रहावे लागेल, असा प्रचार करीत आहेत. शिक्षक आमदारांचे गणित बहुधा कच्चे असावे, असा चिमटा तावडे यांनी यावेळी काढला. काही शिक्षक आमदार दिशाभूल करीत असून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापेक्षा त्यांना शिक्षक बदलीचा प्रश्न जास्त सतावतो आहे, असेदेखील तावडेंनी प्रतिपादन केले.विद्यार्थी निवडणुका पुढील वर्षीपासूननवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने होतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र निवडणुका घेण्यासाठी नियम व परिनियम तयार होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र आता अर्धे सत्र निघून गेले आहे. आता निवडणुका घेणे योग्य होणार नाही.त्यामुळे जून २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून निवडणूका होतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७