शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

‘पवार’बाह्य मुख्यमंत्री शिक्षक संघटनांना खुपतात - विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:44 IST

शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही.

- योगेश पांडेनागपूर : शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. परंतु ‘पवार’बाह्य मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री झाल्यामुळे शिक्षक संघटनांना शाळाबाह्य कामांच्या मुद्याची आठवण आली आहे, या शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांवर टीकास्त्र सोडले.शालेय तसेच उच्च शिक्षणासंदर्भातील विविध मुद्यांवर तावडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड होऊन निवड प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक पदांची भरती ‘पवित्र’ या केंद्रीय परीक्षा पध्दतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याविरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. मात्र न्यायालयाने शासनाची भूमिका उचलून धरली.मुळात पैसे देऊन नोकरी मिळविल्यानंतर हेच शिक्षक आंदोलने करतात व प्रशासन-मंत्र्यांना शिव्यांची लाखोळी वाहतात. या ‘पवित्र’मुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येणार असल्याचा त्यांनी दावा केला.शिक्षक आमदारांचे गणित कच्चेपटसंख्या कमी असणा-या आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या जिल्हा परिषदेच्या राज्यातील १ हजार ३१७ प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त १३ हजार विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित करावे लागेल. मात्र काही शिक्षक आमदार याला राजकीय स्वरूप देत असून यामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित रहावे लागेल, असा प्रचार करीत आहेत. शिक्षक आमदारांचे गणित बहुधा कच्चे असावे, असा चिमटा तावडे यांनी यावेळी काढला. काही शिक्षक आमदार दिशाभूल करीत असून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापेक्षा त्यांना शिक्षक बदलीचा प्रश्न जास्त सतावतो आहे, असेदेखील तावडेंनी प्रतिपादन केले.विद्यार्थी निवडणुका पुढील वर्षीपासूननवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने होतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र निवडणुका घेण्यासाठी नियम व परिनियम तयार होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र आता अर्धे सत्र निघून गेले आहे. आता निवडणुका घेणे योग्य होणार नाही.त्यामुळे जून २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून निवडणूका होतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७